Skip to main content

Posts

Featured Post

जागतिक अवयवदान दिनानिमित्त अपोलोने ६६० हून अधिक अवयव प्रत्यारोपीत रुग्णांना जीवनदान दिले

जागतिक अवयवदान दिनानिमित्त अपोलोने ६६० हून अधिक अवयव प्रत्यारोपीत रुग्णांना जीवनदान दिले  आपला एक 'हो' आठ लोकांना नवसंजीवनी देऊ शकतो नवी मुंबई (प्रतिनिधी): अंतःकरण अशांत असतानाही, बुद्धी शांत ठेऊन घेतलेला एक निर्णय अनेकांच्या जीवनात आशा निर्माण करू शकतो. जागतिक अवयवदान दिनानिमित्त, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने (AHNM) अशा दात्यांच्या धैर्याचा, दान प्राप्तकर्त्यांच्या लवचिकतेचा आणि अवयव प्रत्यारोपणामुळे घडून येणाऱ्या, जीवन बदलवून टाकणाऱ्या परिणामाचा सन्मान केला - नव्या जीवनाकडे नेणारा एक असा प्रवास जो विज्ञान, कौशल्य आणि मानवता एकत्र येऊन घडवून आणतात. प्रत्यारोपणासाठी पश्चिम भारतातील एक अग्रगण्य केंद्र म्हणून, अपोलोने प्रतिष्ठा मिळवली आहे. २०१७ पासून, या रुग्णालयाने ४०८ मूत्रपिंड प्रत्यारोपण, २२९ यकृत प्रत्यारोपण, ११ हृदय प्रत्यारोपण आणि १३ कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत, यातील प्रत्येक केस जीवन जगण्याची दुसरी संधी दर्शवते, गेल्या दशकात भारताने अवयव प्रत्यारोपणात लक्षणीय प्रगती केली आहे, तरीही मागणी आणि उपलब्धता यांच्यातील वाढती तफावत हे एक गंभीर आव्हान आहे. राष्ट्...
Recent posts

अखिल भारतीय अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिला संविधान हक्क महासभेच्या मुंबई येथील राष्ट्रीय बैठक संपन्न

अखिल भारतीय अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिला संविधान हक्क महासभेच्या मुंबई येथील राष्ट्रीय बैठक संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): देशातील १६ राज्यांमधील प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुंबईतील मुलुंड कॉलनी येथे अखिल भारतीय अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिला संविधान हक्क कृती महासभेची राष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देशभरातील सरकारी विभागांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी संघटित पद्धतीने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. अलिकडेच इटावामध्ये ब्राह्मणांनी यादव समाजाच्या कथनकर्त्याला जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ज्या प्रकारे त्रास दिला, ते भविष्यात कधीतरी घडेल आणि अनेक व्यक्ती आणि संस्थांसोबत दररोज घडत आहे, म्हणूनच हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आला. यावर्षी, उज्जैन येथील महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान येथे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांना वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार न देण्याच्या निषेधार्थ देशभरात काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत असेही सांगण्य...

कर्करोगाला मात दिलेल्यांसाठी अपोलो चा 'कॅन विन' सदैव सोबत

कर्करोगाला मात दिलेल्यांसाठी अपोलो चा 'कॅन विन' सदैव सोबत... 'कॅन विन' सपोर्ट ग्रुप कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासात सर्वांना एकत्र जोडतो... नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): राष्ट्रीय कॅन्सर सर्व्हायव्हर्स महिन्याचे औचित्य साधून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, अपोलो कॅन्सर सेंटर (एसीसी) ने 'कॅन विन' सुरु करण्याची घोषणा आज केली. एक कर्करोग समर्थन ग्रुप जो कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासात असलेल्या सर्वांना एकत्र जोडतो. 'सामायिक शक्ती जीवन बदलू शकते' या विश्वासावर आधारित 'कॅन विन' समूह कोणत्याही एका ब्रँडपुरता मर्यादित नाही. या मंचावर ऑन्कोलॉजिस्ट, सायको-ऑन्कोलॉजिस्ट, रुग्ण, कर्करोगातून वाचलेल्या व्यक्ती, रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवकांना एकत्र आणले जाते. सहानुभूती, समर्थन आणि सामायिक भावनेतून काम करणारा एक दयाळू समुदाय तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा फक्त एक समूह नाही तर बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी, शिकण्यासाठी आणि बरे होण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे. आजाराचे नुकतेच निदान झाले असेल, उपचार घेत असाल किंवा दुसऱ्या कोणाची काळजी घ...

‘डॉ. राजेश पाटील’ यांची भाजपाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

‘डॉ. राजेश पाटील’ यांची भाजपाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी प्रख्यात शिक्षणतज्ञ ‘डॉ. राजेश पाटील’ यांची नियुक्ती झाली असून उच्चशिक्षित आणि अनुभवी व्यक्तीची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये व सर्वस्तरावर उत्साहाचे वातावरण झाले आहे. तसेच, डॉक्टर राजेश पाटील यांनी आपल्या राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे नवी मुंबईत विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. पाटील यांनी पक्षाच्या विचारधारेला बळकटी देण्यासाठी आणि नवी मुंबईतील जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर, डॉ. राजेश पाटील यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे नवी मुंबईतील भाजपच्या राजकीय गतिशीलतेला नवा आयाम मिळेल, अशी अप...

कामोठेत “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी” भव्य कुस्ती स्पर्धा; दिग्गज मल्ल आमने-सामने

कामोठेत “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी” भव्य कुस्ती स्पर्धा; दिग्गज मल्ल आमने-सामने लाल मातीत पुन्हा एकदा कुस्तीचा रोमांचक थरार...! पनवेल (प्रतिनिधी):  महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून, शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने“मा.श्री.परेशशेठ ठाकूर केसरी” भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही स्पर्धा रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता कामोठे येथील सेक्टर ६ मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर पार पडणार आहे. या स्पर्धेतील एकूण पारितोषिकांची रक्कम ११ लाख ११ हजार १११ रुपये इतकी असून, नामवंत मल्ल या स्पर्धेत आपल्या ताकदीची चुणूक दाखवणार आहेत. कुस्ती स्पर्धा फक्त एक खेळ नाही, तर देशाच्या मातीतल्या परंपरेचा, ताकदीचा आणि सन्मानाचा एक उत्सव असतो. लढतींत ताकद, धैर्य आणि कुशलता यांचा...

ट्रान्समिशन प्रोजेक्ट जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

ट्रान्समिशन प्रोजेक्ट जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार  प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचे दिले निर्देश पालघर (प्रतिनिधी): वीज पारेषण व वितरण क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन करण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस असून राज्याला आणि देशाला ऊर्जा सक्षम बनवण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हयात विविध अति उच्चदाब वीज वाहिन्या उभारण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्याभरात सुरू असलेल्या विविध ट्रान्समिशन प्रोजेक्ट कामकाजाचा आढावा नुकताच पालघर जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या वतीने घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी सर्व संबंधित वरिष्ठ शासकीय अधिकारी, शासकीय यंत्रणा व प्रकल्पसंस्था समवेत घेऊन संबंधित विभागांना या प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचे निर्देश दिले. सदर बैठकीस महसूल विभागासोबतच वनविभाग, भूमिअभिलेख, कृषी, आणि पोलीस इत्यादी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि इतर यंत्रणांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचा उद्देश हा प्रकल्पांच्या उभारणीचा आढावा घेऊन कामकाजातील उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे, तसेच विविध ...

लोकनेते रामशेठ ठाकूर व सौ. शकुंतला ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य सत्कार

लोकनेते रामशेठ ठाकूर व सौ. शकुंतला ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य सत्कार  रयत शिक्षण संस्थेला सदैव मोलाची साथ.... सातारा (हरेश साठे): रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार, थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी यंदाही रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी ०२ कोटी १२ लाख रुपयांची देणगी दिली असून त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे कर्मवीर भूमीत जाहीर हृद्य सत्कार करण्यात आला.  रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात कर्मवीर अण्णा यांचा ६६ वा पुण्यतिथी कार्यक्रम सातारा येथे समाधी परिसरात संपन्न झाला. यावेळी कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली यांच्या समाधीला अभिवादन करून हा समारंभ पार पडला. आपल्याकडील पैशांचा दातृत्वाने सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे. रयत शिक्षण संस्थेचे ते माजी विद्यार्थी. ‘...