Skip to main content

“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली प्रेमापोटीची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतले:

“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली प्रेमापोटीची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतले: 



आज भारतात या महाआजाराच्या संकटामुळे जगभरातील कामगार वर्ग व मजूरांचा आपल्या मायदेशी जाण्याचे चित्र अनेक ठिकाणी आपल्याला दिसत आहे, हे समजल्या नंतर वर्धा येथील ‘सचिन’ने पूढाकार घेत त्या गरीब हातावर पोट असल्या कामगारांना विनंती केल्यावर दीडशेवर परप्रांतीय गावातच थांबण्यास तयार झाले. जय महाकाली संस्थेचे सचिन अग्निहोत्री व वैद्यकीय मंचचे डॉ. सचिन पावडे या दोघांनी केलेली विनवणी प्रशासनास दिलासा देणारी ठरली.


राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगणा येथील कामगार व मजूर वर्ग वर्ध्यात कार्यरत आहेत. मात्र रोजगार ठप्प पडल्याने ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. प्रशासनाची विनंती त्यांनी धुडकावली. हे दीडशेवर कुटुंब रस्त्याने निघाले असतांनाच अग्निहोत्री व पावडे यांना या विषया बद्दलची माहिती मिळताच त्या लोकांनकडे धाव घेतली त्यांना समजवण्यात आले रस्त्याने जाणे धोकादायक आहे आणि हे सांगितले की तुमच्या राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. वाटेत खाण्यापिण्याचे वांदे होतील. हे संकट झेलण्यापेक्षा तुम्ही कामाशिवाय राहाल तितके दिवस आम्ही तुमला सांभाळून घेऊ, अशी विनंती या दोघांनी केली. आम्हाला आपला मुलगाच समजा, अशी साद त्यांनी महिलांना घातली मग या कुटूंबांनी परत आपल्या झोपडीकडे वळण्याचा निर्णय घेतला.


आर्वी नाका परिसरातील तेलंगणातील मजुरांना डॉ. पावडे यांनी ५ किलो तांदूळ व अन्य साहित्य देऊन अन्नपाण्याची व्यवस्था केली. नंतर सचिन अग्निहोत्री यांनी राजस्थानी व मध्य प्रदेशातील मजुरांकडे मोर्चा वळवला. प्रत्येक कुटूंबाला एका पोत्यात ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, तसेच कणीक, साखर, तेल, डाळ, जिरा पावडर, चणा, वटाणा, पोहे अशा विविध २१ वस्तूंचा ८२० रूपये किमतीचा शिधा दिला. ही मदत पाहून गहिवरलेल्या राजस्थानी महिला चक्क पाया पडायला लागल्या तेव्हा त्यांना धीर देण्यात आला.


स्वयंपाकाची चूल व भांडीकुंडी मजूरांकडे होतीच. यापुढील टप्यात वर्धेतील झोपडपट्टी वसाहतीत १०० कुटूंबांना उद्यापासून धान्य देण्याचे काम वैद्यकीय मंचातर्फे होणार असल्याचे डॉ. पावडे यांनी सांगितले, तर गावातील भिकाऱ्यांना एका ठिकाणी जमा करून त्यांच्या थेट भोजणाची व्यवस्था करण्याचे ठरले असल्याचे अग्निहोत्री यांनी सांगितले, या प्रकरणी प्रशासनाने आमची मदत मागितलेली नव्हती. आम्हीच हे काम करण्यासाठी प्रशासनाला केवळ लेखी संमतीपत्र मागितल्याचे या दोघांनी सांगितले. आम्हाला याचा गवगवा नकोच, असेही ते प्रांजळपणे म्हणाले. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी या कार्यामूळे प्रशासनावरील ताण कमी झाल्याचे मान्य केले. स्वयंस्फूर्तीने मदत करणाऱ्यांची खरच आज यावेळी गरजच आहे असे त्यांनी नमूद केले.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे