महासंकट कोरोना व्हायरस : “उद्धवा चांगलं तुझं सरकार” अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले कौतुक
राज ठाकरे म्हणतात, करोनाचा राज्यात होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारनं केलेल्या उपाययोजनांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.
करोनाचा राज्यात होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारनं केलेल्या उपाय योजनांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. यासाठी मी सरकारचं अभिनंदन करतो. उपाय योजना करायला थोडा उशीर झालाय पण सरकारनं योग्य पावलं उचलली आहेत, असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
राज म्हणाले, “यासंदर्भात काल माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण आता पुढे जाऊन देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी, अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केली आहे. ज्यांनी आजवर डॉक्टरांवर हात उचलले आहेत. त्यांना आता त्यांचं महत्व कळतं असेल. त्या सर्वांना जाणीव झाली असेल की आपण काय चूक केली आहे ते.”
"जो बंद झाला मला अस वाटतंय की, काही मुठभर लोकांना याचं गांभीर्य अजूनही समजत नाही. जर भारतात हे पसरलं तर देशात ६० टक्के लोकांना याची लागण होऊ शकते, म्हणजे हा आकडा किती भयंकर असू शकतो याचा अंदाज यायला हवा. हे आवरण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आहेत का?” असा सवालही राज यांनी त्यावेळी केला, प्रत्येकाच्या दरवाज्यावर टकटक झाल्याशिवाय आम्हाला समजणारच नाही का? महाराष्ट्रातील जनततेला हात जोडून विनंती आहे की याचं गांभीर्य ओळखा आणि सरकारच्या आवाहनला प्रतिसाद द्या. ३१ तारखेपर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे मात्र, लोकांनी सहकार्य करा. हे संकट लवकरात लवकरत टळो, अशी प्रार्थना करतो, असेही राज पुढे म्हणाले. त्याचबरोबर, दरम्यान, हातावर पोट असलेल्यांन सरकारनं मदत करावी, कामगारांचा पगार कंपन्यांनी कापू नये, असे आवाहनही त्यांनी केलं.