Skip to main content

अपुऱ्या पाणी-पुरवठ्यामुळे पनवेलकरांचे झाले हाल :

अपुऱ्या पाणी-पुरवठ्यामुळे पनवेलकरांचे झाले हाल :



पनवेल - कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक चिंताग्रस्त होवून घरात बसले आहेत, पण तसे असताना नवीन पनवेलच्या व इतर काही भागांत घरात बसलेल्या नागरिकांना पाण्याची समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, मागील आठवड्यापासून कमी दाबाने पाणिपुरवठा होत आहे तर काही भागात पाणि वेळेनुसार सोडण्यात येत आहे. त्यामुळे पनवेलच्या काही भागातील व गावानं मध्यले नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत. 


नवीन पनवेल सेक्टर ६, १० आणि १९ मध्ये ही तक्रार असल्याचे नागरिकांनी सांगितले. सेक्टर १९ मध्ये राहणारे ज्ञानेश्वर पाटील यांनी सिडकोच्या पाणिपुरवठा विभागाकडे दोन दिवसांपासून तक्रार केली मात्र पाणि संध्याकाळी येईल, सकाळी येईल अशी कारणे सांगितली जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शट डाऊनमुळे पाण्याचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले, सिडकोच्या पाणिपुरवठा विभागातील अभियंता राहूल सरोदे यांनी सांगितले. सेक्टर १९ मधील काही इमारतीमध्ये खासगी टँकरने पाणिपुरवठा करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. चार दिवसानंतर अखेर मंगळवारी दुपारी पाणि आले मात्र पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे पुरेसे पाणि नागरिकांना मिळाले नाही.



पनवेल मधील शांतीवन, उंब्रोली येथील 'ग्रीन अर्थ' सोसायटी इथेही गेली दोन महिन्यापासुन नागरिकांना पाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, प्रशासाने वेळीच नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष द्यावे.


तसेच खारघर मध्येही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे, खारघर शहरासह आजूबाजूचे गाव आदिवासी वाड्यामध्ये सध्याच्या घडीला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत .शहरातील रांजणपाडा गावात मागील महिनाभरापासून पाण्याची मोठी समस्या असताना स्थानिक नगर सेवक व पालिका प्रशासन काहीच कारवाई करीत नसल्याचे येथील ग्रामस्थ मच्छिद्र चौधरी यांचे म्हणणे आहे.शहरातील धामोळे आदिवासी वाडीत देखील हीच समस्या दिसत आहे.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे