अपुऱ्या पाणी-पुरवठ्यामुळे पनवेलकरांचे झाले हाल :
पनवेल - कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक चिंताग्रस्त होवून घरात बसले आहेत, पण तसे असताना नवीन पनवेलच्या व इतर काही भागांत घरात बसलेल्या नागरिकांना पाण्याची समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, मागील आठवड्यापासून कमी दाबाने पाणिपुरवठा होत आहे तर काही भागात पाणि वेळेनुसार सोडण्यात येत आहे. त्यामुळे पनवेलच्या काही भागातील व गावानं मध्यले नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत.
नवीन पनवेल सेक्टर ६, १० आणि १९ मध्ये ही तक्रार असल्याचे नागरिकांनी सांगितले. सेक्टर १९ मध्ये राहणारे ज्ञानेश्वर पाटील यांनी सिडकोच्या पाणिपुरवठा विभागाकडे दोन दिवसांपासून तक्रार केली मात्र पाणि संध्याकाळी येईल, सकाळी येईल अशी कारणे सांगितली जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शट डाऊनमुळे पाण्याचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले, सिडकोच्या पाणिपुरवठा विभागातील अभियंता राहूल सरोदे यांनी सांगितले. सेक्टर १९ मधील काही इमारतीमध्ये खासगी टँकरने पाणिपुरवठा करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. चार दिवसानंतर अखेर मंगळवारी दुपारी पाणि आले मात्र पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे पुरेसे पाणि नागरिकांना मिळाले नाही.
पनवेल मधील शांतीवन, उंब्रोली येथील 'ग्रीन अर्थ' सोसायटी इथेही गेली दोन महिन्यापासुन नागरिकांना पाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, प्रशासाने वेळीच नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष द्यावे.
तसेच खारघर मध्येही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे, खारघर शहरासह आजूबाजूचे गाव आदिवासी वाड्यामध्ये सध्याच्या घडीला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत .शहरातील रांजणपाडा गावात मागील महिनाभरापासून पाण्याची मोठी समस्या असताना स्थानिक नगर सेवक व पालिका प्रशासन काहीच कारवाई करीत नसल्याचे येथील ग्रामस्थ मच्छिद्र चौधरी यांचे म्हणणे आहे.शहरातील धामोळे आदिवासी वाडीत देखील हीच समस्या दिसत आहे.