मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कळकळीचं आवाहन केले: कोरोना घराबाहेर आहे, त्यामुळे घरातच राहा. कोरोना गुणाकार करण्याची शक्यता, पुढील १५ दिवस महत्त्वाचे :
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कळकळीचं आवाहन केले: कोरोना घराबाहेर आहे, त्यामुळे घरातच राहा. कोरोना गुणाकार करण्याची शक्यता, पुढील १५ दिवस महत्त्वाचे
मुंबई : जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून सरकारनं धाडसी निर्णय घेतला आहे. आता जीवनावश्यक वस्तुंची दुकानं 24 तास दुकाने चालू ठेवणे हा आपल्या सरकारचा धाडसी निर्णय आहे. तुमच्या विश्वासावर हा निर्णय घेतला आहे. तसेच “भाज्यांची वाहतूक सुरु आहे. लक्षात येत आहे त्याप्रमाणे सूचना देत आहोत. शेतीविषयक मजुरांची ये जा थांबता कामा नये. अन्नधान्य पुरवठा करणारी मालवाहतूक थांबवता येणार नाही. ती चालू आहे,” असं उद्दव ठाकरेंनी सांगितलं. मात्र काही ठिकाणी काहीही कारण नसताना झुंबड उडाल्याचं कळालं. गर्दी करु नका असं आवाहन वारंवार करत आहोत”. काही गोष्टी बघून मला धक्काच बसला मात्र अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही आहे अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. लोक जिथे अडकले आहेत. त्यांची व्यवस्था केली जात आहे. मात्र, काही जण ट्रक आणि टँकरमधून प्रवास करत आहे. गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालून अनधिकृत मार्गाने प्रवास करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कोरोनाचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घरीच राहा, अनावश्यक गर्दी टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोनाचे संकट घराबाहेर पडल्यानंतर धोकादायक आहे. त्यामुळे घरात राहण महत्त्वाचं आहे. मात्र, घरात राहताना संकट आल्यासारखं राहू नका. हे संकट घरात येणार नाही. त्यामुळे जिथे आहात तिथे राहा. घरात आनंदी वातावरण ठेवा. आभाळ कोसळलेलं नाही, मात्र घराबाहेर पडाल तर कोसळेल. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ घरात राहणं गरजेचं आहे. विषाणूसाठी निगेटिव्ह आणि घरासाठी पॉझिटिव्ह राहा, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे
उद्धव ठाकरे म्हणाले, खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये. रुग्ण आढळल्यास सरकारी रुग्णालयात पाठवा.यावेळी त्यांनी सांगितले आपण करोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचलो असल्याचं सांगितलं. कोरोनाची लक्षणे असतील तर लपवू नका घाबरुन जाण्याचं कारण नाही, हा आजार पूर्णपणे बरा होतो. आपल्या समोर असणारे संकट मोठे आहे पण “संकटाच्या मागे हात धुवून लागायचं आहे. त्यासाठी आपण सज्ज आहोत. फक्त सहकार्य करा आणि शिस्तीचे पालन करा. तसेच आपल्यासाठी अहोरात्र काम करण्याऱ्या पोलिसांशी विनाकारण वाद घालू नका. ते आपल्या रक्षणासाठी बाहेर आहेत. विनाकारण गर्दी करू नका.
राज्यातील शिवभोजन केंद्रे देखील तीन तास सुरू ठेवण्यात येणार आहे. शिर्डी संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 51 कोटी, तर सिद्धीविनायक संस्थांकडून 5 कोटींची मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले.