'उद्धव ठाकरे म्हणाले", या काळाची नोंद इतिहासात होईल'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाइव्हद्वारे महाराष्ट्राशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपल्या घरीच थांबा असं आवाहन सगळ्या जनतेला केली. तसेच जे पायी जाउन राज्य सोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना राज्य न सोडण्याचीही विनंती करण्यात आली आहे. हे आश्वासन दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही वेळातच महाराष्ट्रात २६२ केंद्रं उभी राहिल्याची माहिती ही दिली आहे.
देशात चाचणी केंद्रं ही वाढवली आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढेल. ही वाढ लक्षात येतीये, पण त्याचबरोबर या विषाणूनं ग्रासलेले लोक बरेही होत आहेत, ही आशादायक गोष्ट आहे. आता न्यूमोनियाची लक्षणं वाढतील. सर्दी-खोकला किंवा न्यूमोनियाचे पेशंट आले, तर त्यांना तातडीने एक्सरे आणि हिमोग्राम करायला सांगा.
आपल्याकडे काही हजार प्रवासी आले आहेत. त्यांना आपण होम क्वारंटाईनमध्ये राहायला सांगितलं. पण ते क्वारंटाईनमध्ये राहत आहेत, की नाही हे पाहणं कुटुंबीयांची तसंच नातेवाईक, शेजाऱ्यापाजाऱ्यांची जबाबदारी आहे. हाय रिस्क ग्रुप म्हणजेच गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध, मधुमेह रुग्ण, तसंच रक्तदाब असलेल्या व्यक्ती यांना अधिक जपणं गरजेचं आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात गर्दी कमी नाही झाली, तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील.
लॉक डाऊन झाल्यानंतर पाच दिवस झाले आहेत. पुढचे दिवसही असेच निघून जातील. आपल्याला आपली जीवनशैली थोडी बदलावी लागतीये इतकंच.
या काळाची नोंद जगाच्या इतिहासात होईल, कारण असा काळ जगानं पाहिला नाही.
कामगारांच्या राहण्याची, तसेच मोफत खाण्याची सोय करतोय'
उद्धव ठाकरे म्हणाले...
संपूर्ण देशात इतर राज्यातील कामगार आपापल्या राज्यात जायला उत्सुक झाले आहेत. महाराष्ट्रात असलेल्या इतर राज्यातील कामगारांनी आहे तिथंच थांबावं, अशी विनंती. कृपया गोंधळ करू नका. महाराष्ट्र सरकार तुमची काळजी घेत आहे. तसेच ठाकरे सरकारने ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्यांसाठी २६२ निवारा केंद्रं उभारण्यात आली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्रात २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये स्थलांतरिक कामगार, बेघर लोक राहू शकतात
कामगारांच्या जेवण्याची तसंच राहण्याची व्यवस्था सरकार करत आहे. त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नका. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातही कामगारांची वाहतूक होता कामा नये.
काही ठिकाणी लोक आवश्यक नसताना बाहेर पडत आहेत. मी विनंती करतो, की वर्दळ करू नका. विनाकारण सरकारला कठोर पावलं टाकायला लावू नका. ही आरोग्यविषयक आणीबाणी आहे. त्यामुळे प्रत्येकानं जबाबदारीनं वागायला हवं.
शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल. सरकार तुम्हाला मदत करत आहे. तुम्हीही सरकारला पूर्ण सहकार्य करावं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्याला संदेश:
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला उद्देशून भाषण करत आहेत. ओढवलेल्या आरोग्य संकटात सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांसह सर्वांचे आभार मानले.
मुख्यमंत्री यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे -
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील सर्व नेते माझ्यासोबत
आहेत. विरोधी पक्षनेत्यांशीही मी चर्चा करत आहे. राज ठाकरे यांच्या सोबतही माझं बोलणं सुरू आहे. सर्वच क्षेत्रातून लोक पुढे येत आहेत मदतीसाठी. मुख्यमंत्री निधीसाठी उदय कोटक यांनी 10 कोटी रुपयांची मदत केली. त्या सर्वांचे मी आभार मानतो. केंद्राशीही आमचा संपर्क आहे. पंतप्रधान, अमित शाह यांच्याशी मी संवाद साधत आहे. केंद्राच्या योजनाही तुमच्यापर्यंत पोहोचतील. डॉक्टरांशी बोलणे चालु आहेत.