राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खार्या पाण्यातील मासळी खुली आहे : अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खार्या पाण्यातील मासळी खुली आहे : अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुंबई : आपल्या राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खार्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरू ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खाद्यपदार्थ बनविणार्या व पोहचवणार्या व्यक्तींनी स्वच्छता आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
तसेच कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणार्या दोघांनीही करोनासंदर्भात आवश्यक ती स्वच्छता व काळजी घेणे महत्त्वाचे आहे , सुरक्षितता बाळगायची आहे. गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, असंही पवार यांनी सांगितलं.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायोमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा करोना प्रतिबंधासाठी व्यग्र असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणार्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजुरांच्या जेवणाची काळजी संबंधित कारखान्यांनाच्या मालकाला घ्यावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगीतले.