राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा असणारे कोल्हापूर मधून एका तरूण उद्योजकांने होम कोरंटाईन रुग्णांसाठी दिले आपले थ्री स्टार हॉटेल:
राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा असणारे कोल्हापूर मधून एका तरूण उद्योजकांने होम कोरंटाईन रुग्णांसाठी दिले आपले थ्री स्टार हॉटेल:
कोल्हापूर : जगभर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, प्रथम लक्षण असणाऱ्या रुग्णांना शासनाने होम कॉरंटाईन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना घरात कसं ठेवायचं ? असा प्रश्न लोकान समोर निर्माण झालेला आहे. पण यावर राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीतील अर्थात कोल्हापुरातील एक तरूण उद्योजक समोर आला आहे. त्यांनी होम कॉरंटाईनची सुविधा नसणाऱ्या रुग्णांसाठी स्वतःचं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल त्या रुग्णांनसाठी खुलं केलं आहे.
कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरात हॉटेल कृष्णा इन आहे. प्रसिद्ध लेखक मृत्युंजयकार रणजित देसाई यांचे ते नातू सिद्धार्थ देसाई यांनी हे हॉटेल २०१३ साली कोल्हापुरात सुरू केलं. हॉटेलच्या व्यवसायात अत्यंत कुशल पद्धतीने सिद्धार्थ चालवतात. मात्र वडील,आजोबा यांच्यापासूनचं घरामध्ये समाजकार्य करण्याची परंपरा देसाई कुटुंबीयांमध्ये आहे. आता हा वारसा सिद्धार्थ देसाई पुढे चालवत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच या रुग्णांना होम कॉरंटाईन ठेवण्याचे आदेश शासनाने दिला आहे. अनेक रुग्णांना विविध कारणाने होम कॉरंटाईन करणं शक्य नसतं ही गरज ओळखून सिद्धार्थ देसाई यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने आपलं थ्री स्टार कॅटेगिरी मधील कृष्णा इन् हॉटेल बंद करून या हॉटेलमधील २८ रूम या कोरोनाबाधीत रुग्णांसाठी देण्याचे ठरविले. ही कल्पना त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर मांडली. त्यानंतर सर्व प्रशासकीय परवानगी घेऊन सिद्धार्थने आपलं हॉटेल होम कॉरंटाईनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी खुलं केले आहे
पण कोरोनाबाधित रुग्ण या हॉटेलमध्ये येणार असल्याचे कळतात हॉटेलमध्ये काम करणारे अनेक जण नोकरी सोडण्याच्या तयारीला लागले. मात्र सिद्धार्थनी त्यांची समजूत काढली आणि आपल्या हॉटेलमध्ये २८ खोल्या या रुग्णांसाठी दिल्या. ज्यांना घरातून डबा येणं शक्य आहे नाही, त्यांना घरातून जेवणाचे डबे येतात. मात्र ज्यांना जेवणाचे डबे येत नाहीत त्यांच्यासाठी चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय सिद्धार्थ यांनी केली आहे. संपूर्ण जगावर संकटकाळ परिस्थिती ओढवलेली आहे. अशा परिस्थितीत प्रशासन सर्वच गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे त्यांना जागरूक नागरिकांनी मदत केलीच पाहिजे.
सध्याची परिस्थिती पाहता आपणही काहीतरी करावं असं या तरुण उद्योजकाला वाटलं आणि त्यांनी स्वतःचं थ्री स्टार हॉटेल या रुग्णांच्या सेवेसाठी दिलं. सिद्धार्थ यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलेलं आहे. नोकरीमध्ये मन रमलं नाही म्हणून त्यांनी हॉटेल व्यवसाया बरोबरच समाजप्रबोधनाचे काम कोल्हापुरात २००६ पासून सुरू केले आहे. घरामध्ये समाज प्रबोधनाचा वारसा असल्यामुळे सिद्धार्थना कोरोनाबाधित रुग्णांसाठी काम करण्याचे बळ मिळाले आहे. आपलं हे काम खूप छोटं असून आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण समाजसेवा करत असून यामध्येच आपणाला समाधान असल्याचं सिद्धार्थ सांगतात. सिद्धार्थ देसाई या तरूणाने घेतलेला निर्णय हा निश्चितचं कौतुकास्पद आहे. समाजातील इतर घटकांनीही सिद्धार्थ यांच्या निर्णयाचं अनुकरण करून अशा आपत्कालीन परिस्थितीत आपले हात खुले करून काम केलं तर कोरोना सारख्या या महारोगला कसल्या परिस्थितीत आपण निश्चितच सगळे मात करू यात शंका नाही.