श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा निराधारांना नित्योपयोगी वस्तूंचे वाटप : औंध, ता. खटाव, जि. सातारा.
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा निराधारांना नित्योपयोगी वस्तूंचे वाटप : औंध, ता. खटाव, जि. सातारा.
सातारा औंध ( शुभम इनामदार ) - जगभरात सध्या चर्चेचा विषय असलेल्या कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉक डाउन आणि जमावबंदी व संचारबंदी चे आदेश असल्याने सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून ज्यांचे छोटे दैनंदिन व्यवसाय बंद झाले आहेत, अशांना तसेच कित्येक निराधार व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला आर्थिक अडचणी येत आहेत. याचा विचार करून औंध येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा अशा गरजू व्यक्तींना आणि निराधारांना नित्योपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचे नियोजन केले गेले. त्यानुसार दिनांक ३१/०३/२०२० रोजी पंचवीस कुटुंबांना तांदूळ, रवा, बेसनपीठ, साबण, गोडेतेल, पोहे अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले. औंध पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. श्री भापकर साहेब यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मोहन शिंदे, उपाध्यक्ष श्री. सदाशिव इंगळे, सचिव श्री. बाळकृष्ण कुंभार, खजिनदार श्री.दत्तात्रय शिंदे तसेच कार्यकारिणी सदस्य सर्वश्री चंद्रकांत कदम, सचिन पवार - पत्रकार, अरूण रणदिवे, जनार्दन पवार, शुभम इनामदार पत्रकार ( सातारा जिल्हा), सचिन सुकटे सर (पत्रकार) इत्यादि उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा आत्तापर्यंत समाजातील दुर्बल घटकांना वैद्यकीय मदत केली आहे आणि गरजूंना आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे.