Skip to main content

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा निराधारांना नित्योपयोगी वस्तूंचे वाटप : औंध, ता. खटाव, जि. सातारा.

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा निराधारांना नित्योपयोगी वस्तूंचे वाटप : औंध, ता. खटाव, जि. सातारा.



सातारा औंध ( शुभम इनामदार ) - जगभरात सध्या चर्चेचा विषय असलेल्या कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉक डाउन आणि जमावबंदी व संचारबंदी चे आदेश असल्याने सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून ज्यांचे छोटे दैनंदिन व्यवसाय बंद झाले आहेत, अशांना तसेच कित्येक निराधार व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला आर्थिक अडचणी येत आहेत. याचा विचार करून औंध येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा अशा गरजू व्यक्तींना आणि निराधारांना नित्योपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचे नियोजन केले गेले. त्यानुसार  दिनांक ३१/०३/२०२० रोजी पंचवीस कुटुंबांना तांदूळ, रवा, बेसनपीठ, साबण, गोडेतेल, पोहे अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले. औंध पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. श्री भापकर साहेब यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.


 यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मोहन शिंदे, उपाध्यक्ष श्री. सदाशिव इंगळे, सचिव श्री. बाळकृष्ण कुंभार, खजिनदार श्री.दत्तात्रय शिंदे तसेच कार्यकारिणी सदस्य सर्वश्री चंद्रकांत कदम, सचिन पवार - पत्रकार, अरूण रणदिवे, जनार्दन पवार, शुभम इनामदार पत्रकार ( सातारा जिल्हा), सचिन सुकटे सर (पत्रकार) इत्यादि उपस्थित होते. 


श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा आत्तापर्यंत समाजातील दुर्बल घटकांना वैद्यकीय मदत केली आहे आणि गरजूंना आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे