कोरोना महासंकट : नवी मुंबई मधील सारसोले व नेरुळ गावातील दोन युवकांनी दिला मदतीचा हात :
नवी मुंबई : आज देशात कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे. अशी परिस्थीती पाहता नवी मुंबई नेरुळ विभागा मधील बरीच कुटुंबे घरी कामाविना अडकून पडली आहेत. रोजगार नसल्याने या कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. हे सर्व लक्षात येताच नवी मुंबई नेरुळ येथील संदिप मेहेर (सारसोले गाव) व जय पाटील (नेरुळ गाव) यांच्याकडून मिळाला गरजू, हातावर पोट असलेले मजूर आणि कामगार यांना दिला मदतीचा हात.
अनाथ आश्रमालाही मदत :
दररोज २ वेळचे जेवण व जीवनावश्यक वस्तूचे वाटप अनाथ आश्रम मधील लोकांनाही देत आहेत, तसेच या अशा परिस्थितीत उदरनिवार्हाचे साधन नसणार्या गरजू कुटुंबांना धान्य, किराणासह, जीवनावश्यक वस्तू व रोज २ वेळचे जेवन देखील देत आहेत. स्वताच्या स्वखर्चाने या तरुणांनी जेवण, किराणा माल व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
परंतु, काही ठिकाणी जिथे सरकारला पोहोचणे अशक्य झाले आहे, अशा ठिकाणी हे असे सेवाभावी देवदूत मदतीसाठी पुढे येत आहेत. आज या दोन तरुणांनी गरजूंना अन्न, धान्य, जीवनावश्यक गोष्टीं वाटप करून आज लोकांन समोर एक चांगला आदर्श घडवून दिला आहे. खरच अश्या तरुणांची आपल्या देशाला खरी गरज आहे.
नवी मुंबई विभागातील गरजूंना याचा लाभ देण्यात येणार असल्याने अशा गरजू व्यक्तींनी त्यांना संपर्क करावा असेही त्यांनी सांगितले आहे.
संपर्क संदिप मेहेर - 9867921716 (९८६७९२१७१६)
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.