कोरोना महासंकट : हॉटस्पॉट भाग वगळता ४ मे रोजी लाॅकडाऊन उठवण्यावर एकमत, मात्र रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम :
कोरोना महासंकट : हॉटस्पॉट भाग वगळता ४ मे रोजी लाॅकडाऊन उठवण्यावर एकमत, मात्र रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम :
पंतप्रधानांचे राज्यांना आवाहन लॉकडाऊन उठवण्याबाबत धोरण तयार करा.
नवी मुंबई : देशातील कोरोनाबाधित हॉटस्पॉट असणाऱ्या भागात ३ मेनंतरही लॉकडाऊन सुरू राहील हे जवळपास निश्चित झाले आहे, तर ग्रीन झोनमधील लॉकडाऊन उठवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांत सोमवारी व्ही.सी. द्वारे झालेल्या बैठकीत अशी सहमती झाली आहे. बैठकीनंतर पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी म्हणाले की, बहुतेक मुख्यमंत्री ३ मेनंतरही लॉकडाऊन ठेवण्याच्या बाजूने आहेत. मात्र, त्यासोबतच हळूहळू आर्थिक कारभार सुरू करण्याचीही मागणी झाली आहे. राज्या-राज्यांत रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक ३ मेनंतरही बंद ठेवण्यावर सर्व मुख्यमंत्र्यांत एकमत दिसले. सूत्रांनुसार ग्रीन झोनमधील लॉकडाऊन सवलतींची घोषणा ३ मेनंतरच होईल. राज्यांनी स्थितीनुसार लॉकडाऊनच्या सवलतीबाबत धोरण ठरवावेेे. अर्थव्यवस्था सुस्थितीत असून घाबरण्याची गरज नसल्याचे या वेळी पंतप्रधानांनी सांगितले.
- शाळा, माॅल बंद राहणार; ग्रीन झाेनमध्ये खासगी वाहने चालवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता
- ग्रीन झोनमध्ये ३ मेनंतर टाळेबंदीत सूट दिली तरीही शाळा, महाविद्यालये, शाॅपिंग माॅल, धार्मिक स्थळे, सार्वजनिक वाहतूक बंद राहील. समारंभासाठी एकत्र येण्याचे निर्बंध कायम राहतील.
- ग्रीन झोनमध्ये मर्यादित स्वरूपात खासगी वाहने चालवण्यास परवानगी मिळू शकते. पण रेल्वे, विमान प्रवास सुरळीत सुरू हाेण्याची काेणतीही शक्यता नाही. संसर्गाच्या आधारावर मेच्या मध्यापर्यंत काही ठिकाणांसाठी रेल्वे व विमान सेवांची मर्यादित वाहतूक सुरू हाेऊ शकते.
- टाळेबंदीच्या एक्झिट प्लॅनवर शनिवारी अंतिम निर्णय हाेईल.
- ओडिशासह ५ राज्ये ३ मेनंतरही टाळेबंदीत वाढ करण्याच्या बाजूने
- ओडिशाने ३ जूनपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याची मागणी केली. पुद्दुचेरी, गाेवा, मेघालय, तेलंगण देखील टाळेबंदी वाढवण्याच्या मताचे आहेत.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांनी राज्यांना आपल्या येथील परिस्थितीनुसार टाळेबंदीतील धाेरण ठरवावे असे सांगितले आहे.
- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, जाेपर्यंत केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा हाेत नाही ताेपर्यंत काेटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणे शक्य नाही. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने खुली करावी, असे गुजरात सरकारचे मत आहे.
- ममता म्हणाल्या- सर्व राज्यांना व्यक्त हाेण्याची संधी नाही
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सर्व राज्यांना व्यक्त हाेण्याची संधी मिळत नसल्याचा आराेप केला. मला संधी मिळाली असती तर राज्यात केंद्रीय पथक पाठवण्याचा मुद्दा मांडला असता, असे त्या म्हणाल्या.
हॉटस्पॉटचे निकष : जेथे रुग्ण १०० पेक्षा जास्त आहेत, रुग्ण दुपटीचा वेगही जास्त आहे, असे ३० जिल्हेच केंद्राने हॉटस्पॉट मानले आहेत, मात्र काही राज्यांत १०० पेक्षा कमी रुग्णाचे जिल्हे हॉटस्पॉट आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.