Skip to main content

कोरोना महासंकट : गृहमंत्री देशमुख यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला; ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, असे लोक सुद्धा जेव्हा या पद्धतीनं राजकारण करतात: 

कोरोना महासंकट : गृहमंत्री देशमुख यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला; ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, असे लोक सुद्धा जेव्हा या पद्धतीनं राजकारण करतात:


नवी मुंबई (बातमी मुंबई) : लॉकडाउनच्या काळात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या कपिल वाधवान यांना प्रवासासाठी पत्र दिल्याच्या प्रकरणाचा अहवाल अखेर समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला असून, त्याविषयी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुकलाईव्हद्वारे संवाद साधत माहिती दिली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या राजकारणावरून देशमुख यांनी टीकाही केली.



कपिल वाधवान आणि त्यांना प्रवासासाठी शिफारस पत्र दिल्याच्या प्रकरणाची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. “या सर्व प्रकरणामध्ये अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार लॉकडाउनच्या काळात वाधवान कुटुंबीयांना मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी मंत्रालयातून जे पत्र देण्यात आलं होतं, स्वतः आपणच दिल्याचं अमिताभ गुप्ता यांनी कबूल केलं आहे. हे देताना त्यांच्यावर कुणाचाही दबाव नव्हता, असंही त्यांनी चौकशीत म्हटलं आहे. या प्रकरणाची फाईल तयार होईल आणि ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाईल. त्यानतंतर यावर निर्णय होईल. त्याचबरोबर हा चौकशी अहवाल पुढील काळात सार्वजनिक करण्यात येईल,” असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


“देश आणि महाराष्ट्र करोनाशी लढत आहे. अशा परिस्थितीत कोणतंही राजकारण न करता, सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आजच्या परिस्थिती राजकारण बाजूला ठेवून लढलं पाहिजे असं म्हणाले होते. असं असताना काही मंडळी, त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरचं किंवा नगर पालिका स्तरावर राजकारणं करणारा मी समजू शकतो. पण, ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, असे लोक सुद्धा जेव्हा या पद्धतीनं राजकारण करतात, ही अतिशय दुखद अशी गोष्ट आहे,” असा टोला गृहमंत्री देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लगावला.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे