कोरोना महासंकट : राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र :
कोरोना महासंकट : राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र :
कोरोनामुळे राज्यातील ३ महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्त करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू आहेत.
नवी मुंबई : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. पण देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. देशासह राज्यात टाळेबंदी लागू केल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेचा समावेश आहे. या तिनही महानगरपालिकांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता या तिनही मोठ्या महानगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्त करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या तिनही महानगरपालिकांची मुदत संपत आली आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे निवडणुका घेणं अशक्य असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या महानगपालिकांवर प्रशासकीय आयुक्त नेमावा असं पत्र राज्य निवडणुक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासकीय आयुक्तांच्या नेमणुकीसाठी हालचाली देखील सुरू केल्या आहेत.
तसेच औरंगाबाद महानगपालिकेची मुदत, २८ एप्रिल रोजी संपत असून नवी मुंबई महानगपालिकेची मुदत ७ मेरोजी संपणार आहे. तर वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २८ जून रोजी संपणार आहे. कोरोनामुळे या तीनही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून त्या लवकर होणं शक्य नाही, त्यामुळे या तीनही महापालिकांवर प्रशासक नियुक्त करावा असं पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.