कोरोना महासंकट : मुख्या प्राण्यांनवरही उपासमारी; पण बेलापुर येथील शर्मा कुटुंबानी दिला मदतीचा हात:
पण अनेक समाजसेवी व भावनात्मक माणसं मुख्या प्राण्यांना जवळ करतायत तर काही आसरा देखील देतायत.
नवी मुंबई : कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ९०० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. अनेक जण आता भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, कोरोना विषाणूचा फटका आता प्राण्यांनाही बसू लागला आहे. भारतामध्ये बेरेच कुत्री, मांजरी रस्त्यावर सोडून दिले आहेत आणि काहीतर जन्मता रस्त्यावरच राहत आहेत.
आजची उद्योग नगरी वेब न्यूज़ ला माहिती मिळाली की नवी मुंबई बेलापुर शहरातील सेक्टर ८ मधील अशाच एका स्वयंसेवी जोडप्यांनी श्री. संदीप शर्मा व सौ. नीता शर्मा यांनी मुख्या प्राण्यांना दिला मदतीचा हात.
तसेच या दोघांनी संगितले की, लॉकडाउन झाल्यापासून आणि त्याआधीही पासुनच "आम्ही अनेक भटक्या व सोडलेल्या कुत्र्यांची दररोज अन्न देत आहोत, यातले काही कुत्रे लोकांनी सोडून दिलेले पण असतिल."
बेलापुर येथील व त्यांच्या अपार्टमेंटमध्ये तसेच बेलापुर सेक्टर - १,२, ८, या भागातील ७० कुत्र्यांना दररोज ते कुटुंब २० किलो चिकन वाफवून त्या मुख्या प्राण्यांना खाण्यास देत आहेत तेही स्वताच्या स्वखर्चाने.
"पण इथं लॉक डाउनमुळे खूपच बिकट परिस्थिती झाली आहे. लोकांना बाहेरही पडू दिलं जात नाहीय. प्राण्यांसाठीचे दुकानातले खाद्यपदार्थ संपण्याची भिती देखील लोकांना वाटु लागली आहे.
कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यामुळे आज जगभरात परिस्थिती खुप भयानक झालीय, माणसां प्रमाणे आज अनेक मुख्या प्राण्यांनवर देखील उपासमारीची वेळ आली आहे, तसेच अनेक पाळीव प्राणी उपासमारीमुळं मृत्युमुखी देखील पडत आहेत. पण काही मुख्या प्राण्यांपर्यांतच आम्ही पोहोचू शकतोय. आम्ही याहून अधिक काही करूही शकत नाही, मात्र जेवढं शक्य आहे, तेवढं आम्ही नक्कीच करू," असंही श्री व सौ. शर्मा म्हणाले, त्यांच्या डोळ्यांमधली संवेदनशीलता आणि प्राण्यांनप्रती असलेला जिव्हाळ दिसून येत होता.
आज लॉक डाउनमुळे सर्व दुकानं बंद असल्यानं कुत्र्यांना खाण्यासाठी काही मिळत नाहीय. मांजरी आणि कुत्री रस्त्यावर फिरताना, भुंकताना दिसणं आता हे सामान्य होऊन गेलंय," असं ही त्यांनी सांगितले. खरतर पाळीव प्राण्यांना वाचवण्यासाठी लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. लोकांचा सहभाग खरंच मुख्या प्राण्यांना सुखावणारा असेल.
आपल्या देशात बरीच लोकही मुख्या पाळीव प्राण्यांना वाचवण्यासाठी पुढे येत आहेतच असेही त्या सांगत होत्या.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.