कोरोना महासंकट : मुंबई महापालिकेची धक्कादायक माहिती ; राज्यात सर्वाधिक कहर एकट्या महाराष्ट्रात :
नवी मुंबई (बातमी अशोक वाघमारे) : देशभरात कोरोना विषाणूचा सर्वाधिक कहर महाराष्ट्रात आहे. राज्यात एकूण ५७००० हून जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातही सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या मुंबईत आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं की, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) १५२९ कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यत कोरोनामुळे २५ कर्मचाऱ्यांनी प्राण गमावला आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदा बीएमसीने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
मागच्या दोन महिन्यात महापालिकेत किती कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि तसेच किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत कर्मचारी संघटनेने माहितीची मागणी केली होती. त्यांतर संयुक्त नगर आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) मिलिन सावंत यांनी २० मे रोजी एक परिपत्रक जारी केले. त्यात कोरोना विषाणूबाधित कर्मचारी आणि मृतांच्या संख्येचा त्यांनी त्यात उल्लेख आहे.
बीएमसी ने दिलेली माहिती अशी की, मुंबई फायर ब्रिगेड आणि सुरक्षा विभाग देखील कोरोनामुळे प्रभावित झाला आहे. फायर ब्रिगेडमध्ये जवळपास ३५ कर्मचारी कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत २ जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर सुरक्षा विभागात ८० हून कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे असून एकाचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी दिवसभरात १०५ जणांचा मृत्यू :
राज्यात बुधवारी एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले. १०५ मृत्यूंसह मृतांची एकूण संख्या १८५७ वर गेली आहे. २१९० नव्या रुग्णांसह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा रुग्णांची एकूण ५६९४८ वर गेला. राज्यात ९६४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे होणाऱ्यांची संख्या १७९१८ झाली आहे. राज्यात ३७१२५ अॅक्टिव्ह उपचारीत रुग्ण आहेत.
दुसरीकडे, मुंबईत दिवसभरात १००२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही ३३ हजार ९७४ वर पोहोचली आहे. तर बुधवारी दिवसभरात ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोना विषाणूच्या बळींची संख्या १०६५ वर पोहोचली आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.