Skip to main content

कोरोना महासंकट : तब्बल नऊ वर्षा नंतर गायब झालेले जहाज परत किनाऱ्यावर आले, बघुन झाले हैरान..!!!

कोरोना महासंकट : तब्बल नऊ वर्षा नंतर गायब झालेले जहाज परत किनाऱ्यावर आले, बघुन झाले हैरान..!!!


नवी मुंबई : इंडियन ओशनमध्ये म्यानमारजवळ एक विचित्र घटना गेल्या आठवड्यात घडली, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. येथील सी गार्ड्सना एक असे जहाज जे समुद्रात आढळले आहे, जे सुमारे नऊ वर्षांपूर्वी अचानक गायब झाले होते.


म्यानमारजवळ आढळून आलेल्या या जहाजाची जेव्हा कोस्ट गार्ड्सनी तपासणी केली, तेव्हा त्यामध्ये एकही वस्तू किंवा त्यातला कोणी चालक दलातील एकही सदस्य नव्हता. या जहाजावरुन जगभरात चर्चा सुरु होत असून लोक याला घोस्ट शिप (भूतांचे जहाज) असे म्हणत आहेत. 



या जहाजाचे नाव सैम रताउलांगी पीबी १६०० आहे. हे जहाजच्या ट्रान्सपोंडरने २००९ मध्ये अखेरचे तायवाननजीक असल्याची माहिती दिली होती. म्यानमारच्या सुमद्राजवळ असे बेवारस जहाज आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. 


म्यानमारची राजधानीजवळून ११ किलोमीटर अंतरावर मर्तबानच्या खाडीजवळ मच्छीमाचारांना हे जहाज सर्वप्रथम दिसले. यांगना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी आणि गार्ड्स या जहाजावर तपासणीसाठी गेले होते, पण त्यांना तेथे काहीही आढळले नाही. जहाजाला जंग लागला होता. मालवाहक जहाजावर चालक किंवा इतर कुणीही नव्हते.  जहाजावर इंडोनेशियाचा झेंडा होता.



अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जहाज समुद्राच्या मध्यभागी आढळले. पण याविषयी अजून काही सांगणे सध्या योग्य नाही. जगभरातील जहाजांची माहिती ठेवणा-या मरीन ट्रॅफिक वेबसाइटनुसार हे जहाज २००१ साली तयार झाले होते. 


या जहाजाविषयीचे वृत्त येताच जगभरात त्यावरुन अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. काही लोकांनी हे भूताचे जहाज असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हॉरर चित्रपटांशी त्याची तुलना केली आहे. सध्या तपास एजन्सी याचा शोध घेत असून काही अधिकारीदेखील याला घोस्ट शिप म्हणत आहेत. 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे