कोरोना महासंकट : कोरोनाच्या काळात पनवेल येथील नेरे गावात हजारोंच्या गर्दीत पार पडला हळदी समारंभ; असले समारंभ, लग्न आयोजित करण्यावर निर्बंध घातले पहिजे :
कोरोना महासंकट : कोरोनाच्या काळात पनवेल येथील नेरे गावात हजारोंच्या गर्दीत पार पडला हळदी समारंभ; असले समारंभ, लग्न आयोजित करण्यावर निर्बंध घातले पहिजे :
पनवेलमध्ये मे/जून मध्ये होणारे विवाह यंदा लॉकडाउन आणि कोरोनाच्या महामारी मुळे होवू शकले नाही. त्यामूळे बरेचलोक नाईलाजास्तव हा समारंभ साजरा करता आला नाही. या हळदीच्या समारंभामध्ये नवरदेवाच्या भावाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याचे समोर झाले आहे. आता या वादग्रस्त हळदी समारंभामुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पनवेल(बातमी-उमेश खांदेकर) - राज्यात आज सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु आहे सरकारच्या संगितलेल्या नियमानुसार या काळात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडावेत पण असे असतना पनवेल तालुक्यातील नेरे गावात हजारो लोकांच्या उपस्थिती पार पडलेला हा हळदी समारंभ आता वादात सापडला आहे. या समारंभामधील नवरदेवाचा भाऊ हा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आता उघड झाले आहे. या वादग्रस्त हळदी समारंभामुळे तालुका पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आता या लॉकडाऊनच्या काळात या अश्या गर्दी होत असणाऱ्या सभा, समारंभ, लग्न आयोजित करण्यावर परत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत होणारे विवाह यंदा होवू शकले नाही. यंदा हा जल्लोष अनेकांना नाईलाजास्तव साजरा करता आला नाही. काहींनातर घरातच लग्न पार पाडून उत्सवावर विरजण घालावे लागले. पनवेल तालुक्यातील नेरे गावातील एका कुटूंबाने करोना विषाणूचे गांभिर्य लक्षात न घेता १४ जुन रोजी मोठ्या थाटामाटात हळद या कुटूंबातील लोकांनी साजरी केली. नवरदेवाचे वडील वामन पाटील यांनी पाहूण्यांना खूश करण्यासाठी हळदीत खेकड्याच्या जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता.नेरे गावात पार पडलेल्या या हळदीत तब्बल 500 पेक्षा जास्त नातेवाईक आणि मित्रपरिवाराने हजेरी लावली अशी माहिती देखील समोर आली आहे.
लग्न झाल्यानंतर २ दिवसांनी नवरदेवाच्या भावाला सर्दी, खोकला आणि ताप सुरू झाला. आता ६ दिवसांपुर्वी त्याचा मृत्यु झाला. या मृत्युनेच हा अत्यंत चुपचाप पध्दतीने हा सोहळा पार पडलेल्याचे उघड झाले. आणि त्यानंतर हा मृत्यू कोरोनाने झाल्याचे आता उघड झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नवरेदेवाचे वडील वामन पाटील ,भाऊ तसेच वधूच्या वडिलांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांनी वृतास दिली.
आता या घटनेननंतर तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली असुन लोकांच्या मनात भितिचे वातवरण निर्माण झाले आहे. परंतु अद्यापही लग्न, हळदी समारंभ पार पडत असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लोकांनी अशाप्रकारे बेजबाबदार पणा न करता आपल्या सोबत इतरांचे जीव धोक्यात टाकू नये असे अवाहन शासकीय यंत्रणेद्वारे करण्यात आले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.