कोरोना महासंकट : कोरोनाचे रुग्ण वाढण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंना भीती, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संख्या वाढेल:
कोरोना महासंकट : कोरोनाचे रुग्ण वाढण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंना भीती, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संख्या वाढेल:
पुणे : महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. पुर्ण दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहेत. एका दिवसात इतके रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि त्यामध्येच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रोगाबाबत एक नवीन अंदाज व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वाढेल, आता अशी भीती राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. रुग्णसंख्या वाडण्याची चिंता नाही, पण मृत्यूदर वाढू नये, ही आमची प्राथमिकता असल्याचंही राजेश टोपे म्हणाले आहेत.
मुंबईतली रूग्णांची संख्या कमी होईल, परंतु आता मुंबई-पुण्यातून राज्यातल्या इतर भागात गेलेल्या काही संशयीत रुग्णांमुळे त्या त्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
पुर्ण एका दिवसात कोरोना विषाणूचे सर्वाधिक नवीन रूग्ण ५,०२४ वाढले आहेत. तसेच १७५ जणांच्या मृत्यूची नोंद देखिल झाली आहे, त्यापैकी ९१ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, ८४ मृत्यू हे मागच्या काळातील आहेत. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ४.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आत्तापर्यंत ७,१०६ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १,५२,७६५ एवढी झाली आहे. आणि तसेच सध्या ६५,८२९ रुग्ण हे ऍक्टिव्ह केसेस आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.