Skip to main content

कोरोना महासंकट : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची पुण्यात महत्वाची घोषना; राज्यात यापुढे लॉकडाऊन नसुन यापुढे विषय अनलॉकचा असेल :

कोरोना महासंकट : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची पुण्यात महत्वाची घोषना; राज्यात यापुढे लॉकडाऊन नसुन यापुढे विषय अनलॉकचा असेल :


नवी मुंबई (बातमी-पुणे प्रतिनिधि) - राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २६ जून रोजी पुण्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा केली. आणि ती म्हणजे, आता यापुढे राज्यात लॉकडाऊन नसणार आहे. तसेच आता केंद्र असो वा राज्य आता विषय लॉकडाऊनचा नाही तर अनलॉकचा असेल. राज्यात आता अनलॉक २-३ असेल, असं आरोग्य मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.



राज्य भरात कोरोना विषाणूबाधित रुग्ण वाढत आहेत सध्या याची चिंता नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी ही दिवसागणित वाढतच आहे, याबाबत आहे, असेही राजेश टोपेंनी यावेळी सांगितलं. विरोधकांच्या टीकेत कोणतेही तथ्य नाही. कोरोना विषाणूमुळं झालेला एकही मृत्यू लपवला नसल्याचंही यावेळी त्यांनी त्यांच्या बोलण्यातुन स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे सुरु असंही ते यावेळेस म्हणाले.


तसेच महाराष्ट्र, मुंबई पुण्यामध्ये कोविड-१९ चाचण्या कमी झाल्या यात देखील तथ्य नसल्यांचंही ते म्हणाले आहेत. देशात सर्वाधिक चाचण्या या मुंबई, पुण्यात घेण्यात आल्या. १ लाखामागे मुंबईत २२ हजार आणि पुण्यात १५ हजार कोविड-१९ च्या चाचण्या होत आहेत. पण काही रुग्ण मृत झाल्यानंतर ते कोरोना पॉजिटिव्ह येत असल्यानं त्यांची संख्या नंतर वाढत आहे.


पुणे आणि सोलापुरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत, हे शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे मी आणि अनिल देशमुख याचा आढावा घेत असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी १ लाख अँटी जेन चाचण्या घेतल्या जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची घोषणा यावेळी टोपेंनी केली आहे.


पुण्यात ससून रुग्णालयात वरिष्ठ प्राध्यापक आणि सहप्राध्यापक कोरोना विषाणू वार्डात जात नाहीत, अशा तक्रारी निवासी डॉक्टरांकडे आल्या आहेत. मात्र, त्यात तथ्य नसल्याचं देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे