कोरोना महासंकट : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची पुण्यात महत्वाची घोषना; राज्यात यापुढे लॉकडाऊन नसुन यापुढे विषय अनलॉकचा असेल :
कोरोना महासंकट : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची पुण्यात महत्वाची घोषना; राज्यात यापुढे लॉकडाऊन नसुन यापुढे विषय अनलॉकचा असेल :
नवी मुंबई (बातमी-पुणे प्रतिनिधि) - राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २६ जून रोजी पुण्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा केली. आणि ती म्हणजे, आता यापुढे राज्यात लॉकडाऊन नसणार आहे. तसेच आता केंद्र असो वा राज्य आता विषय लॉकडाऊनचा नाही तर अनलॉकचा असेल. राज्यात आता अनलॉक २-३ असेल, असं आरोग्य मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
राज्य भरात कोरोना विषाणूबाधित रुग्ण वाढत आहेत सध्या याची चिंता नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी ही दिवसागणित वाढतच आहे, याबाबत आहे, असेही राजेश टोपेंनी यावेळी सांगितलं. विरोधकांच्या टीकेत कोणतेही तथ्य नाही. कोरोना विषाणूमुळं झालेला एकही मृत्यू लपवला नसल्याचंही यावेळी त्यांनी त्यांच्या बोलण्यातुन स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे सुरु असंही ते यावेळेस म्हणाले.
तसेच महाराष्ट्र, मुंबई पुण्यामध्ये कोविड-१९ चाचण्या कमी झाल्या यात देखील तथ्य नसल्यांचंही ते म्हणाले आहेत. देशात सर्वाधिक चाचण्या या मुंबई, पुण्यात घेण्यात आल्या. १ लाखामागे मुंबईत २२ हजार आणि पुण्यात १५ हजार कोविड-१९ च्या चाचण्या होत आहेत. पण काही रुग्ण मृत झाल्यानंतर ते कोरोना पॉजिटिव्ह येत असल्यानं त्यांची संख्या नंतर वाढत आहे.
पुणे आणि सोलापुरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत, हे शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे मी आणि अनिल देशमुख याचा आढावा घेत असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी १ लाख अँटी जेन चाचण्या घेतल्या जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची घोषणा यावेळी टोपेंनी केली आहे.
पुण्यात ससून रुग्णालयात वरिष्ठ प्राध्यापक आणि सहप्राध्यापक कोरोना विषाणू वार्डात जात नाहीत, अशा तक्रारी निवासी डॉक्टरांकडे आल्या आहेत. मात्र, त्यात तथ्य नसल्याचं देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.