कोरोना महासंकट : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला १० वारकऱ्यांसह आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना; पोलीस आणि आरोग्य पथक सहभागी असणार:
कोरोना महासंकट : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला १० वारकऱ्यांसह आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना; पोलीस आणि आरोग्य पथक सहभागी असणार:
श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी बस मध्ये ठेऊन ३० जूनला पालखी महामार्गाने पंढरपूरला घेऊन जाणार, यामध्ये सहभागी असणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना विषाणू तपासणी केली जाणार असून फक्त १० जणांनाच जाण्यास परवानगी मिळणार आहे. त्यासोबत पोलीस आणि आरोग्य विभागाचेही पथक सोहळ्याबरोबर असणार आहे.
नवी मुंबई (बातमी-देहूगाव) : यंदाच्या २०२० च्या आषाढीवारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी बस मध्ये ठेऊन ३० जूनला पालखी महामार्गाने पंढरपूरला घेऊन जाणार आहेत, यामध्ये सहभागी असणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना विषाणू तपासणी केली जाणार असून फक्त १० जणांनाच जाण्यास परवानगी मिळणार आहे. त्यासोबत पोलीस आणि आरोग्य विभागाचेही पथक सोहळ्याबरोबर असणार आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने यंदा वारकरी संप्रदायाने आषाढी पायी वारी सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आषाढीवारीसाठी विविध संताच्या पालख्या पंढरपूरला येतात. संतांच्या पादुका घेऊन ३० जूनला दशमीच्या दिवशी दुपारी वाखरीत येतील तेथून सर्व पालख्या पंढरपूमध्ये प्रवेश करणार आहेत.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका ३० जुन रोजी पहाटे सहाच्या सुमारास १० वारकऱ्यांसह पंढरपूकडे रवाना होणार आहेत. त्यासाठी शासनाने विषेश बसची व्यवस्था केली आहे. पालखीला घेऊन जाणाऱ्या बसला फुलांची सजावट हेणार असून कापूर ओढ्या जवळ असलेल्या अनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती होईल. यानंतर दुसरी अभंग आरती चिंचोलीत होईल, आरती झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाईल. रोटी घाटात सकाळी ९ च्या सुमारास तिसऱ्या अभंग आरतीसाठी काही वेळ थांबेल. तेथून हा सोहळा वाखरीयेथे दुपारी १२ च्या सुमारास पोहोचेल.
वाखरीत संत भेट, चौथी अभंग आरती होईल. संस्थानच्या वतीने नैवद्यप्रसाद दाखविण्यात येईल. त्यानंतर हा सोहळा पंढरपूरात सायंकाळी ४ च्या सुमारास पोहोचेल. थोरल्या पादुका येथे पाचवी अभंग आरती होईल. येथून ५ च्या सुमारास नगरप्रदक्षिणा, त्यानंतर पादुका मुक्कामस्थळी नेण्यात येतील. एकादशी १ जुलैला सकाळी ७ ला नगर प्रदक्षिणा, सकाळी ८ च्या सुमारास पादुकांना परंपरेप्रमाणे चंद्रभागा स्नान घालण्यात येईल व पादुका तेथील पुंडलिक महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात येतील. पुंडलिक महाराजांचे दर्शन झाल्यानंतर पादुका वैष्णव देवता पांडूरंगाच्या द्वारदर्शनासाठी महाद्वारात नेण्यात येणार आहे. तेथे सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी हा अभंग होईल. यानंतर पादुका श्री संत तुकाराम महाराज मठामध्ये ५ दिवसांसाठी विसावतील. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरा येथे काल्याचे किर्तन व काल्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल. यानंतर पादुका नगरप्रदक्षिणा करून पुन्हा श्री संत तुकाराम महाराजांच्या मठामध्ये नेण्यात येईल व दुपारी ३ च्या सुमारास पादुका दर्शन सोहळा पुन्हा बसने परतीच्या प्रवासाला निघेल.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.