कोरोना अपडेट : राज्यातील मच्छिमारांना विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय..!!!
नवी मुंबई(बातमी/मुंबई) : प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या " क्यार " व " महा " या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल ६५ कोटी १७ लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला . रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद १० हजार रुपये असे ४ हजार १७१ सभासदांना ४ कोटी १७ लाख , बिगर यांत्रिक नौकाधारकांना प्रत्येकी २० हजार प्रमाणे १ हजार ५६४ नौकाधारकांना ३ कोटी १२ लाख ८० हजार , १-२ सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे ४ हजार ६४१ जणांना ९ कोटी २८ लाख २० हजार , ३-४ सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी ३० हजार प्रमाणे १ हजार ५२६ जणांना ४ कोटी ५७ लाख ८० हजार , ६ सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी ३० हजार रुपये प्रमाणे ७ हजार ६७१ जणांना २३ कोटी १ लाख ३० हजार रुपये , विक्रेता मच्छिमारांना ५० लि . क्षमतेच्या दोन शितपेटया पुरवठा प्रत्येकी ३ हजार प्रमाणे ३५ हजार जणांना २१ कोटी रुपये देण्यात येतील . याचा लाभ ५४ हजार ५७३ मच्छिमारांना मिळेल . हा लाभ त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ( डीबीटी ) जमा करण्यात येईल . लहान मासळी
आ. विनोद निकोले यांच्या मागणीला मिळाले यश:
राज्यातील मच्छिमारांना विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉमेड विनोद निकोले यांच्या मागणीला यश मिळाले आहे . यावेळी आ . निकोले म्हणाले की , आम्ही १७ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री , मत्स्यव्यवसाय विकास मंत्री व राज्यमंत्री यांना ई - मेल द्वारे कोरोनाच्या पाश्वभूमीवर ही मागणी केली होती . संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे . पालघर जिल्ह्यास समुद्र किनारा लाभला आहे . सध्याच्या परिस्थितीमध्ये मच्छिमार वर्ग अडचणीत आला आहे . काही होडी सुरू आहेत तर काही बंद आहेत . लॉकडाऊनमुळे मासे विकले जात नाहीत . तर १५ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करण्यात येते आणि होडी किनाऱ्यावर आणल्या जातात . अर्थात या सर्व घटनेत मच्छिमार वर्ग प्रचंड प्रमाणात अडचणीत आला असून नुकसानीत आहे . मच्छिमार वर्गातील पुरुष मंडळी समुद्रात ७ ते ८ दिवसासाठी जात असतात आणि मासेमारी करून आणत असतात . महिला मंडळी त्या माशांचे वर्गीकरण करून ओले आणि सुके मासे करून विकतात . त्यावर वर्षभर मच्छिमार वर्गाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो . तसेच काही मासे सोसायटीला विकत असतात . तर अनेक व्यापारी या मच्छिमार वर्गाकडून मासे विकत घेऊन जात असतात . त्यातील काही व्यापारींनी बोली केल्याप्रमाणे पैसे दिले आहेत , तर काहींनी दिलेले नाहीत . त्यामुळे मच्छिमार वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे . अशा आशयाचे पत्र डहाणू विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून कॉ . विनोद निकोले यांनी राज्य सरकारला दिले होते . त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने १९ एप्रिल २०२० रोजी संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहे , असे कळविले होते .
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.