Skip to main content

न्यूज अपडेट मान्सून : अतिवृष्टी होण्याचा इशारा; मुंबईकरांनी रात्री घराबाहेर पडू नका..।।।।

न्यूज अपडेट मान्सून : अतिवृष्टी होण्याचा इशारा; मुंबईकरांनी रात्री घराबाहेर पडू नका..।।।।


परतीच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे.



नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- मुंबई व इतर उपनगराला या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागान मध्ये पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांमध्ये, परेल नाट्यगृहात आणि काही रुग्णालयात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांसह रुग्णांची एकच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


जोरदार पाऊस कोसळत असल्याने खबरदारी म्हणून मुंबईत पाच एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत आहे. दरम्यान, झवेरी बाजारमध्ये दागिन्यांच्या दुकानात पाणी साचलंय. त्यामुळे दागिन्यांचं नुकसान झाले आहे. सायन परिसरातही चांगलंच पाणी तुंबलं होतं. सायनमधील गांधी मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अनेक गाड्या या पाण्यात अडकल्या होत्या. शिवडीमधल्या बीडीडी चाळीतही पावसाचे पाणी शिरले. याठिकाणी घरांमध्ये पाणीच पाणी झाले होते. गाड्या देखील पाण्यात असल्याचं पाहायला मिळाले. यावरुन विरोधकांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले. त्यानंतर शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलेय.


मुंबईत ३०० मिमी पाऊस झाला तर पाणी साठणार नाही का, असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर विरोधकांचे काम टीका करणे आहे, असा टोला शिवसेनेने विरोधकांना लगावला आहे. मागील ४० वर्षांपासून मुंबईत १०० मिमी पाऊस झाला तरी काही भागात पाणी साठतेच, असे सत्ताधाऱ्यांनी म्हणत विरोधकांचे आरोप फेटाळलेत.



संध्याकाळी ४.०० वा. 
एल्फिन्स्टन ब्रिज जवळ पाण्याचा निचराच न झाल्याने वाहतूक बंद होती. मुंबईकर सकाळपासून अर्ध्या वाटेतच खोळंबलेले पाहायला मिळाले.


दुपारी २.०० वा. 
मुंबई सेट्रलच्या एसटी डेपोमध्येही पाणी साचल्यानं अनेक एसटी बसेस जागेवरच उभ्या होत्या.  
वरळीत अतिवृष्टीमुळे भिंत कोसळली. वरळीतील पोलीस कँम्प परिसरात ही घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गिरगावमध्येही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पहायला मिळालं. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं. 


दुपारी ०१.०० वा. 
दरवर्षीच हिंदमाता परिरसरात पाऊस झाला की पाणी साचतंच. त्याप्रमाणे इथे अनेक दुकांनामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.


दुपारी १२.०० वा. 
चेंबूर परिसरात नागरिकांना गुडघाभर पाण्यातून जावं लागलं.


सकाळी ११.०० वा. 
दादर परिसरातही अनेक ठिकाणी पाणी साचलं. मुंबईत रात्रभर झालेल्या पावसाचा नायर हॉस्पिटलला फटका बसला. नायर रुग्णालयात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल झाले.


सकाळी १०.०० वा. 
मुसळधार पाऊस आणि साचलेल्या पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही फटका बसला. काही लांब पल्ल्याच्या गाड्या रिशेड्यूल करण्यात आल्या. तर काही गाड्या आहे त्याच ठिकाणी उभ्या केल्या गेल्या. 


सकाळी ९.०० वा. 
किंग्ज सर्कल या परिसरातही दरवर्षीच पाणी तुंबंत असतं. यंदाही या परिसरात पाणी तुंबल्याने मोठ्या प्रमाणात वाहनं अडकली होती.


सकाळी  ८.३० वा. 
चिंचपोकळी परिसरातही कंबरेएवढं पाणी साचलं होतं. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.


सकाळी  ८.०० वा. 
शिवडीमधल्या बीडीडी चाळीतही पावसाचं पाणी शिरलं. याठिकाणी घरांमध्ये पाणीच पाणी झालं होतं. गाड्या देखील पाण्यात असल्याचं पहायला मिळालं. 


सकाळी ०७.३० वा. 
सायनमधील गांधी मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अनेक गाड्या या पाण्यात अडकल्या होत्या.


सकाळी ०७.०० वा. 
सायन परिसरातही चांगलंच पाणी तुंबलं होतं.


सकाळी ०६.३० वा. 
झवेरी बाजारमध्ये दागिन्यांच्या दुकानात पाणी साचलंय. त्यामुळे दागिन्यांचं नुकसान झालंय. या परिसरात लाईटही गेलीय. 


 


 


 


 


महत्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे