न्यूज अपडेट : आजचे रेकॉर्ड ब्रेक; राज्यात एका दिवसात कोरोनाच्या ३२ हजार रुग्णांना डिस्चार्ज :
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद, एका दिवसात ३२ हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ७४ हजार ६२३ ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
नवी मुंबई (प्रतिनिधि/मुंबई) :- राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली आहे. आज ३२ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के इतके नोंदवले गेले असून आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा निम्म्या संख्येने नवीन रुग्णांचे निदान झाले. आज राज्यात १५ हजार ७३८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ७४ हजार ६२३ ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ५९ लाख १२ हजार २५८ नमुन्यांपैकी १२ लाख २४ हजार ३८० नमुने पॉझिटिव्ह म्हणजे २०.७१ टक्के आले आहेत. राज्यात १८ लाख ५८ हजार ९२४ लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ५१७ लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे.
भारतातील कोरोमुक्त रुग्ण सर्वाधिक:
देशभरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत पोहचलं आहे. बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होऊन, भारतात सलग तिसऱ्या दिवशी ९० हजारपेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ९३ हजार ३५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ लाख ९६ हजार ३९९ इतकी होती. जगात रूग्ण बरे होणाऱ्या संख्येच्या बाबतीत भारत उच्च स्थानावर पोहोचला आहे. ही संख्या जगातील एकूण संख्येच्या १९ टक्के एवढी आहे.
महत्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.