Skip to main content

न्यूज अपडेट : ग्राहकांना दिलासा; नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याच्या भावामधे ३० रुपयांची घसरण:

न्यूज अपडेट : ग्राहकांना दिलासा; नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याच्या भावामधे ३० रुपयांची घसरण:


नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारा मध्ये आज १२५ गाड्यांची आवक झाली असून त्यापैकी ७६ गाड्या भरुन कांदा दाखल झाला आहे.



नवी मुंबई (प्रतिनिधि) :-  नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केटमध्ये घाऊक बाजारात आज १२५ गाड्यांची आवक झाली असून त्यापैकी ७६ गाड्या भरुन कांदा दाखल झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे पाहाला मिळाले.


गेल्या सात दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले होते. कांदा हा ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. आज मार्केटमध्ये कांदा ६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला उठाव नसल्याने कांद्याच्या दरात ३० रुपयांची घसरण झाली असल्याचे काही व्यापारी सांगतात.


३० वर्षांपासून कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले की, “काही व्यापारी अनधिकृतपणे कांद्याची साठवणूक करून दरवर्षी दसरा-दिवाळी सणाच्या वेळी कांद्याच्या दरात वाढ करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच शेतकऱ्यांकडून कमी दरात कांदा विकत घेऊन बाजारात जास्त दराने त्याची विक्री करत असतात”.


यामध्ये शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही, असेही तोतलानी यांनी सांगितले. कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करुन कांद्याचा भाव वाढवला जातो. शेतकऱ्याला मात्र चांगला दर मिळत नाही. परिणामी शेतकरी हा कंगाल तर व्यापारी मालामाल होत आहे.


सध्या मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरात ३० रुपयांची घसरण झाली असून ६० ते ७० रुपये किलोने कांदा विकला जात आहे. तसेच नाफेड, इजिप्त, इराण या ठिकाणांहून आलेल्या कांद्यालादेखील उठाव नसल्याने हा कांदा बाजारात पडून आहे. इजिप्त आणि इराणमधून एकूण ५० टन कांदा आला असून हा कांदा ५० ते ६० रुपये किलोच्या दराने विकला जात आहे. परंतु बाजारात ग्राहक नसल्याने कांद्याला उठाव नाही.


सध्यचा कांद्याचा भाव..?


नवीन कांदा : २० ते ६० रुपये कि.लो.


नाफेडवरून आलेला कांदा : २५ ते ५० रुपये कि.लो.


इराण व इजिप्तवरून आलेला कांदा : ५५ ते ६० रुपये कि.लो.


मध्यप्रदेशमधून आलेला कांदा : ५५ ते ६० रुपये कि.लो.


 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे