न्यूज अपडेट : आदर पुनावाला यांचा धक्कादायक खुलासा;पुढील २० वर्षे तरी कोरोनाच्या लसीची गरज जगाला भासणार:
न्यूज अपडेट : आदर पुनावाला यांचा धक्कादायक खुलासा;पुढील २० वर्षे तरी कोरोनाच्या लसीची गरज जगाला भासणार:
नवी मुंबई (प्रतिनिधि) :- कोरोना विषाणूची महामारी पुढील काही महिन्यात आटोक्यात येणार असं जर आपल्याला वाटत असेल तर हा आपला गैरसमज आहे. कारण कोरोनाचा विषाणू हा लवकर नष्ट होणार नाही असे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे ज्या देशांमध्ये कोरोना आजार आटोक्यात आला होता त्यानंतर पुन्हा तिथे कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याचे दिसून आल आहे. जगातील सगळ्यात मोठी लस निर्माण करणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन आदर पुनावाला यांनीही याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
तसेच, आदर पुनावाला म्हणाले की, जगभरात पुढच्या २० वर्षांपर्यंत कोरोना राहणार असून तोपर्यंत कोरोना लसीची गरज भासणार आहे. पूर्ण इतिहासात असे एकदाही घडले नाही की, एकदा लसीचा वापर झाला की पुन्हा लसीची गरज भासली नाही.
फ्लू, निमोनिया, पोलियो, कांजण्या या आजारांवर लसी अनेक वर्षांपासून दिल्या जात आहेत. यातील कोणत्याही आजाराचे लसीकरण बंद करण्यात आलेले नाही. जरी लोकसंख्येतील १०० टक्के लोकांचे जरी लसीकरण करून झाले तरीही लसीची गरज आपल्याला भासणारच आहे.
लस हा ठोस उपाय नाही. लसीमुळे फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होणार आहे आणि यामुळे कोरोनापासून बचाव होईल. सिरम इन्स्टिट्यूट २०२१-२२ शेवटपर्यंत जगभरातून पाच वेगवेगळ्या लसी बनवण्याच्या प्रयत्न करणार आहेत.
जवळपास १ अब्ज डोस तयार करण्यात येतील. आमची योजना प्रत्येक तिमाहीतील लस लॉन्च करण्याची आहे. या योजनेची सुरुवात कोव्हीशिल्डपासून होणार आहे, असे आदर पुनावाला म्हणाले आहेत. business.today.in ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संगितले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.