न्यूज अपडेट : मोदींच्या दो गज दूरी मंत्राला,भाजपा कडूनच वाटाण्याच्या अक्षता:
नवी मुंबई (बातमी/नवी दिल्ली) :- गेल्या ८ महिन्यांच्या काळात संपूर्ण देशात कोरोना विषाणूने कहर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने कोरोना संक्रमणाला संदर्भात चिंता व्यक्त करत आले आहेत.कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या मनोगतात, दो गज की दूरी, बहुत है जरूरी, असे आवाहन देशवासीयांना सातत्याने करत असतात. गेल्या पंधरा दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दो गज दूरी मंत्राला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम भाजप सातत्याने करत आहे.
बिहार निवडणुकीनंतर दिल्लीत भाजपाच्या वतीने घेण्यात आलेल्या विजय मेळाव्यात प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली, या मेळाव्याला स्वतः नरेंद्र मोदी उपस्थित होते. मात्र, त्यांना विजयोत्सव मेळाव्यात मोदींना दो गज दूरी मंत्राचा विसर पडला.
आजही असाच प्रकार घडला आहे.हैदराबाद महानगरपालिकेच्या भाजप उमेदवार निवडणूक प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हैदराबादला आले.शहांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रोड मध्ये प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली.मात्र शहांना यावेळी ही दो गज दूरीचा विसर पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संदर्भात नेहमीच चिंता व्यक्त करताना, सातत्याने दो गज की दुरी मंत्र महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र भारतीय जनता पक्षानेच पंतप्रधान मोदींच्या मंत्राला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा चंग बांधलेला दिसून येत आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.