न्यूज अपडेट : धक्कादायक बाब; नवी मुंबई, खारघर, पनवेलकर घेत आहेत प्रदूषित हवेत श्वास..!!
नवी मुंबई (बातमी/रुपाली वाघमारे) :- एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार वातावरन फाउंडेशनने उघड केले की खारघर, पनवेल आणि तळोजा पट्ट्यातील रहिवाशी हे प्रदूषित हवेत श्वास घेत आहेत.
पर्यावरण गटाने केलेल्या महिन्याभराच्या हवामानाच्या अभ्यासानुसार पहाटेच्या वेळी प्रदूषण हे शिगेला पोहोचले आढळून आले. यामुळे, मॉर्निंग वॉक करणारे आणि जॉगर्सना धोका निर्माण होतो आहे. तथापि, रहिवासी दररोज सुमारे १७ तास प्रदूषित हवा श्वास घेत आहेत.
या भागातील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर पी एम २.५ (PH2.5) चे उच्च प्रमाण पहाटे ६ ते सकाळी ८ च्या दरम्यान पहाण्यात आले आसुन. यापैकी बरीच धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे जटिल मिश्रण आहे आणि ते मानवी जीवनास घातक आहेत, ज्यामुळे ते कमी दृश्यमानता आणि धुके यासाठी जबाबदार आहेत. ते लहान सूक्ष्म कण आहेत जे दिवस किंवा आठवडाभर हवेमध्ये राहू शकतात आणि फुफ्फुसांच्या वायुमार्गाच्या अरुंद भागावर आक्रमण करण्यासाठी आणि आरोग्यास आजार निर्माण करण्यास पुरेसे आहेत.
दरम्यान, या पट्ट्यावरून गोळा केलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीवरून असेही सूचित झाले आहे की पनवेलमधील १ महिन्याच्या कालावधीत ‘खराब हवा दिवस’ साचली आहे, जिथे बहुतेक दिवस हवेच्या गुणवत्तेच्या अनुज्ञेय पातळीचे भारतीय मानक पार केले होते.
सकाळी ७ वाजता सुमारास सरासरी पातळी २.५ असावी, स्वयंसेवी संस्थेने १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत पाच ठिकाणी कमी किंमतीच्या रिअल-टाइम एअर क्वालिटी मॉनिटर्स (Real-Time Air Quality Monitors) बसवून हा अभ्यास केला.
तळोजाच्या एमआयडीसी क्षेत्रात एक मॉनिटर बसविण्यात आले, तर पनवेलमधील सेक्टर १३, सेक्टर-३६ खारघर आणि सेक्टर -७ तळोजा मधील नावडे या भागातील निवासी क्षेत्रात ४ पाचही ठिकाणी एमआयडीसी, तळोजा येथे (PM 2.5) पी एम २.५ पातळी सर्वाधिक असल्याचे दिसून आले.
कंपन्यांकडून विषारी वायू हवेत सोडल्या जाणार्या, सुरू असलेल्या बांधकामांमुळे आणि महामार्गावरून जाणार्या वाहनांच्या धूरांमुळे तळोजा एमआयडीसी भागातील प्रदूषणाची पातळी ही चिंताजनक पातळीवर गेली आहे.
सलग महिन्यासाठी तपासणी केलेल्या हवेच्या गुणवत्तेत सुमारे २०० पर्यंत प्रदूषण पातळी नोंदविली गेली आहे. जर वायू प्रदूषणाची पातळी सायंकाळी ६० च्या खाली असेल तर त्याचा मानवी शरीरावर परिणाम होत नाही.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.