Skip to main content

न्यूज अपडेट : २५ डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन :

न्यूज अपडेट : २५ डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन :

लेख/माहीती :- २५ डिसेंबर १९२७ रोजी एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह परिषेदेत मनुस्मृतीचे जाहीर दहन केले .स्त्री शूद्रांच्या गुलामगिरीचे प्रतीक असणाऱ्या मनुस्मृतीचे दहन हा तत्कालीन परिस्थितीत सनातनी धर्ममार्तंडाना फार मोठा धक्का होता. समाजातील एका फार मोठया वर्गावर हजारो वर्षांपासून अलिखित मालकी गाजविण्याचा लिखित परवाना असलेली मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे दहन केली होती.

जेव्हा भारतीय राज्यघटना निर्मितीचे महान कार्य डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांवर सोपविण्याuत आले , तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्यायावर आधारित राज्यघटना निर्माण केली कदाचित उपेक्षित वर्गाला त्यांनी आजपर्यंत जे दुःख दैन्य - दास्य सहन केले आहे त्याची योग्य  ती परतफेड करण्याची संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गमवायची नव्हती. 

एकवेळी माता रमाईना लिहिलेल्या एका पत्रात डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , मी स्त्री मुक्तीसाठी व स्त्री उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे स्त्रियांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आवश्यक जो संघर्ष केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे खरे तर माणूस म्हणून आमचा विचार करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या माध्यमातून आमचा सर्वोपरी विचार करणाऱ्या डॉ.भीमराव रामजी आंबेडकरांचा अभिमान वाटतो.

या देशात अंधाराला प्रकाश म्हणण्याची सक्ती हिंदू धर्माकडून हजारो वर्षे झाली वर्ण श्रष्ठेत्वाची सगळी सूत्र हाती घेतलेल्या हिंदू धर्मातील एकही पढीक  विद्यावनाला स्त्री - शूद्रांवर मनुस्मृती मधून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावीशी वाटली नाही प्रकाश कधीही काळा नसतो हे सांगण्यासाठी तिचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या देशात डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या सूर्यालाच जन्म घ्यावा लागला.

प्रकाश स्वातंत्र्य देतो ,समता देतो प्रगती आणि विकास देतो हे सांगण्यासाठी हिंदू धर्मावर डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी केलेला प्रहार म्हणजेच आंधरयुगाचा अंत असलेला मनुस्मृती दहन दिन होय.


(भीम आर्मी- भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य)

मुंबई प्रचार प्रसिद्धी प्रमुख

मा.सागर कांबळे ( पत्रकार )






महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे