न्यूज अपडेट : २५ डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन :
लेख/माहीती :- २५ डिसेंबर १९२७ रोजी एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह परिषेदेत मनुस्मृतीचे जाहीर दहन केले .स्त्री शूद्रांच्या गुलामगिरीचे प्रतीक असणाऱ्या मनुस्मृतीचे दहन हा तत्कालीन परिस्थितीत सनातनी धर्ममार्तंडाना फार मोठा धक्का होता. समाजातील एका फार मोठया वर्गावर हजारो वर्षांपासून अलिखित मालकी गाजविण्याचा लिखित परवाना असलेली मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे दहन केली होती.
जेव्हा भारतीय राज्यघटना निर्मितीचे महान कार्य डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांवर सोपविण्याuत आले , तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्यायावर आधारित राज्यघटना निर्माण केली कदाचित उपेक्षित वर्गाला त्यांनी आजपर्यंत जे दुःख दैन्य - दास्य सहन केले आहे त्याची योग्य ती परतफेड करण्याची संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गमवायची नव्हती.
एकवेळी माता रमाईना लिहिलेल्या एका पत्रात डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , मी स्त्री मुक्तीसाठी व स्त्री उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे स्त्रियांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आवश्यक जो संघर्ष केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे खरे तर माणूस म्हणून आमचा विचार करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या माध्यमातून आमचा सर्वोपरी विचार करणाऱ्या डॉ.भीमराव रामजी आंबेडकरांचा अभिमान वाटतो.
या देशात अंधाराला प्रकाश म्हणण्याची सक्ती हिंदू धर्माकडून हजारो वर्षे झाली वर्ण श्रष्ठेत्वाची सगळी सूत्र हाती घेतलेल्या हिंदू धर्मातील एकही पढीक विद्यावनाला स्त्री - शूद्रांवर मनुस्मृती मधून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावीशी वाटली नाही प्रकाश कधीही काळा नसतो हे सांगण्यासाठी तिचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या देशात डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या सूर्यालाच जन्म घ्यावा लागला.
प्रकाश स्वातंत्र्य देतो ,समता देतो प्रगती आणि विकास देतो हे सांगण्यासाठी हिंदू धर्मावर डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी केलेला प्रहार म्हणजेच आंधरयुगाचा अंत असलेला मनुस्मृती दहन दिन होय.
(भीम आर्मी- भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य)
मुंबई प्रचार प्रसिद्धी प्रमुख
मा.सागर कांबळे ( पत्रकार )
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.