Skip to main content

न्यूज अपडेट : उलवे शहरात वटवृक्ष लागवडीकरिता आवश्यक जागेची सिडकोकडे मागणी :

न्यूज अपडेट : उलवे शहरात वटवृक्ष लागवडीकरिता आवश्यक जागेची सिडकोकडे मागणी :

नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- वडाचे झाड अर्थात वटवृक्ष हा भारत देशाचा राष्ट्रीय प्रतिक आहे. कित्येक पक्षांच्या प्रजातींचा तो अन्नदाता आहे, १२ तासाहून अधिक काळ ऑक्सिजन देणारा अक्षयवट आहे. वटवृक्षांची नवी मुंबईचा संकल्प हाती घेतलेल्या उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने उलवे शहरातील प्रत्येक सेक्टर मधे विविध ठिकाणी फक्त पाच वटवृक्ष लावण्याकरिता सिडकोकडे जागेची मागणी केली आहे.

ह्या मागणीचा संस्थेचा खास एकच उद्देश असा आहे की, जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी विवाहित स्त्रिया ह्या वडाची पुजा करतात. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य मिळण्याकरिता वडाला धागा बांधून जन्मोजन्मी सोबत राहण्यासाठी सात फेरे घेतात. आज उलवे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वटवृक्षांची संख्या मात्र फारच कमी असल्याचे दिसुन येते. शिवाय उलवे सेक्टर २४,२५,२५ए मधे तर एकही वटवृक्ष नसल्याने यापुढे तेथील सुहासिनीना वटपौर्णिमेचा व्रत पुर्ण करण्यासाठी खुप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

वडाचे झाड उपलब्ध नसल्याने फांद्या तोडून घरच्याघरी वटपौर्णिमा साजरी करण्याची वेळ येवून ठेपते. अगोरच विमानतळासाठी केलेल्या वृक्षतोडीमुळे उलवे शहरांतील हवा प्रदुषणात वाढ झाली आहे. त्यामुळे वटवृक्षांच्या रोपांचे जास्तीत जास्त लागवड करुन वटपौर्णिमेच्या सणाची परपंरा अशीच कायम पुढे अवितरपणे चालु राहण्याकरिता उलवे शहरांतील प्रत्येक सेक्टर मधे किमान पाच वटवृक्षांसाठी आवश्यक जागेची मागणी संस्थेचे अध्यक्ष वृक्षप्रेमी किरण मढवी यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि सिडकोचे मुख्य सामाजिक सेवा अधिकारी यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.






महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे