न्यूज अपडेट: युवासेनेची विद्यार्थी हितासाठी मागणी; दहावी व बारावी परीक्षेच्या प्रवेश अर्जाची मुदत वाढवणार..!!
न्यूज अपडेट: युवासेनेची विद्यार्थी हितासाठी मागणी; दहावी व बारावी परीक्षेच्या प्रवेश अर्जाची मुदत वाढवणार..!!
नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे बंद असलेले शाळा-कॉलेज त्यात बाहेरून बसणाऱ्या काही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता आले नाही त्याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या युवासेनेकडे तक्रारी येत होत्या त्याची दखल घेत युवासेनेचे स्वप्नील सूर्यकांत मढवी ऐरोली उपविधानसभा अधिकारी यांनी नवी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, बोर्डाचे अध्यक्ष श्री के बी पाटील साहेब तसेच सहाय्यक सचिव श्री भोज सर, प्रशासकीय अधिकारी श्रीमती सुमन मॅडम ह्यांना भेटून चर्चा केली विषयाचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असल्या कारणाने त्वरित मान्यता घेणार असे देखील आश्वासन दिले आहे.
यावेळेस सोबत युवासेनेचे श्री किसन सावंत, युवासेना मुंबई समन्वयक, श्री राज सोनावणे, श्री मितेश लोटलीकर ,ऐरोली विधानसभा समन्वयक श्री सुरजजी नाईकरे ,ऐरोली उपविधानसभा अधिकारी श्री नरेश सकपाळ उपस्थित होते.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.