Skip to main content

न्यूज अपडेट: नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकला; मनोज मेहेर:

न्यूज अपडेट: नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकला; मनोज मेहेर:

नवी मुंबई (नेरुळ- प्रतिनिधी/नीलेश भोईर) :- राज्यात कोरोनाचा पुन्हा होवू लागलेला उद्रेक पाहता नवी मुंबई महानगरपालिकेची  सहावी सार्वत्रिक निवडणूक चार-सहा महिने पुढे ढकलण्याची लेखी मागणी सारसोळेचे ग्रामस्थ आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी लेखी निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक उच्चांक आपल्या महाराष्ट्र राज्यातच झालेला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने केलेले प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहेत. राज्य सरकारचे आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी पायाला भिंगरी लावून परिश्रम केले आहेत. कोरोना कमी झाला असे वाटत असतानाच कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्याचे राज्यात पहावयास मिळू लागले आहेत. लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी होवू लागल्याने मास्कविना फिरणे, गर्दीत मिसळणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे आदी प्रकार वाढीस लागले आहेत. 

त्यातच महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकारण्यांकडून सार्वजनिक हळदीकुंकू, आरोग्य शिबिरे, अत्यल्प दरात धान्य वाटप यासारखे विविध कार्यक्रमांचे आयोजन वाढीस लागले आहे. यातूनही नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक वाढीला लागण्याची भीती आहे. राजकारणापेक्षा, निवडणूकीपेक्षा नवी मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. निवडणूका चार-सहा महिन्यांनी कधीही घेता येतील, परंतु कोरोनाचा उद्रेक झाल्यास होणाऱ्या जिवितहानीच्या नुकसानीची आपण भरपाई कोठून करणार? राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार व  पुन्हा नव्याने होवू लागलेला उद्रेक पाहता नवी मुंबईच्या हितसाठी महापालिका सार्वत्रिक निवडणूका चार-सहा महिने पुढे ढकलणे आवश्यक आहे. जालन्यात नुकतेच लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे चित्र अन्यत्रही दिसण्याची शक्यता आहे. कोरोना पूर्णपणे संपुष्ठात आल्यावर नवी मुंबईसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे