न्यूज अपडेट: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा..!!
पनवेल (प्रतिनिधी/किरण पवार) :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी इथल्या शेतकऱ्यांनी आपली पिढी शेती राहते घर देशाच्या विकासासाठी अर्पण केले सिडकोने इथल्या शेतकऱ्यांना देशातील सर्वोत्तम पुनर्वसन करून देऊ असं आश्वासन दिलं आणि थोड्या फार प्रमाणात त्याने पुनर्वसन केलं सुद्धा परंतु दहा गावातील मोजक्याच शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न शिल्लक राहिलेल्या आहेत आणि सिडको प्रशासनाने जर मनावर घेतला तर ते प्रश्नही लगेच सुटतील. गेल्या तीन वर्षापासून हे शेतकरी सिडको ऑफिस समोर आपले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन, मोर्चे करून शासनाला आपले न्याय हक्क मिळावे म्हणून लढत आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या-
● शुन्य पात्रता/कमी पात्रता /ओटे/शेड.
● चिंचपाडा तळावपाळी तीनपट भुखंड व इतर लाभ.
● मंदिरे व खाजगी मंदीरे यांना पुर्नवसन पॅकेज लागु करावे.
● ड्रेनेज स्किम / टाटा पावर लाईन / देवस्थान व ट्रस्टीच्या जमिनीचे १२.५०% व २२.५०% टक्के विकसीत भुखंड प्रकल्पग्रस्त शेतक-्यांना देण्यात यावे.
● महीला मंडळे व महिला बचत गट यांना सरसकट पुर्नवसन पॅकेज लागु करावे.
● घर भाडे भत्ता मार्केट रेट प्रमाणे स्वतंत्र कुटुंबास देण्यात यावे.
● विमानतळ बाधित परंमपरागत व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरूष मच्छिमारांना २०१३ च्या कायद्या प्रमाणेनुकसान भरपाई देण्यात यावे.
● विमानतळ बाधित १० गावातील १८ वर्षावरील सर्व युवक व युवरतींना प्रशिक्षण व नोकरी तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दाखला देणे.
● बांधकाम खर्च २५००/- रु. प्रती चौ. फुट द्या
समाजिक सुकसुविधा-
● क्रिकेट मैदान.
● आगरी कोळी कराडी समाज भवन.
● लहान मुलांचे प्ले ग्राउंड व त्याचे शुशोभीकरण.
● गणपती विसर्जन घाट.
● पुर्नवसन क्षेत्रातील पुरातन तलावाचे शुशोभीकरण व तलावाशेजारी आरक्षित ठेवलेल्या गार्डन भूखंडाचे शुशोभीकरण.
● गावातील सार्वजनिक संस्था व मंडळे यांचा कार्यलयास भूखंड देणे.
● पुर्नवसन येथील पुरातन वृक्षाचे संवर्धन करणे.
● सार्वजनिक शौचालय व दफन भूखंड आरक्षित करून देणे.
● पुरातन मरुआई मंदिर व वेशीआई मंदीराचे पुर्नवसाहत ठिकाण स्वतंत्र भूखंड आर १ प्लॉट नं ०६ व ३१ येथे आरक्षित करूण पुनर्वसन लाभ देणे.
● अंगणवाडीसाठी इमारत उभारून देणे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.