न्यूज अपडेट: तीन भावंडांवर नवी मुंबईत कोयत्याने केला जीवघेणा हल्ला:
नवी मुंबई (रूपाली वाघमारे) :- नवी मुंबईतील वाशी परिसरात किरकोळ वादातून वैश्य कुटुंबातील दोन भाऊ व एका बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई 2 कुटुंबांमधील वादाचे रूपांतर एक भ्याड हल्ल्यात झाले आहे. नवी मुंबईतील कोपरी गावात तीन भावंडांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले असून दुसऱ्या भावाची प्रकृती स्थिर आहे.
वैश्य कुटुंबातील मुलगी काजल हिची छेड काढल्याची तक्रार पोलिसात केल्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला होता. त्यातूनच हा जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी कुटुंबाने कोयत्याने हल्ला केला. रितिक आणि अमित हे भाऊ, तर त्यांची बहीण काजल हिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी हल्लेखोर आरोपी श्रीनिवास अय्यरला ताब्यात घेतले आहे. तर इतर चार जण घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. याविषयी कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात तर पोलिसांनी याविषयी बोलण्यास नकार दिलाय.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.