न्यूज अपडेट: पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारी वाढवण्याच्या श्रेयस ठाकूर यांच्या मागणीला यश:
न्यूज अपडेट: पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारी वाढवण्याच्या श्रेयस ठाकूर यांच्या मागणीला यश:
● मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO) ने दखल घेत महापालिका आयुक्तांना उचित कारवाई करण्यासाठी पाठवले पत्र*
पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :- पनवेल शहरातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळाची गरज आहे.येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराकरिता डॉक्टर व आरोग्य कर्मचारी पुरवण्याची मागणी दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना पत्राद्वारे केली होती. पत्राची दखल मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO)ने घेतली व महापालिका आयुक्त यांना पत्र पाठवत सदर प्रकरणी आपल्या स्तरावरून शासनाच्या प्रचलित कायदे, नियम, धोरणानुसार उचित तत्काळ कार्यवाही करावी व अर्जदारास परस्पर कळविण्यात यावे, तसेच एक प्रत विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन यांना पाठविण्यात यावी असे पत्र मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल) तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन यांनी श्रेयस ठाकूर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. उपजिल्हा रुग्णालयाची सद्यस्तिथी पाहता १५६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल आहेत.
त्यापैकी ऑक्सिजन ६० रुग्ण, ICU ८ रुग्ण. इतके रुग्ण सद्यस्तिथीत उपचार घेत आहेत.इतक्या रुग्णांच्या उपचाराकरिता कमीत कमी २ फिजिशियन,२ भूलतज्ञ, तसेच १० वार्ड बॉय, २ औषधनिर्माता एवढ्या मनुष्यबळाची गरज असून सध्या उपजिल्हा रुग्णालयात १ फिजिशियन गेल्या ४ महिन्यांपासून एकट्याच कार्यरत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ पुरवल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होईल. सध्यास्थितीत नवी मुंबईच्या रुग्णालयात भूलतज्ञ व फिजिशियन २.५ लक्ष एवढे मानधन घेत आहेत. पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात तेवढेच मानधन दिल्यास ते उपजिल्हा रुग्णालयात काम करण्यास उपलब्ध होतील.त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराकरिता डॉक्टर व आरोग्य कर्मचारी पुरवण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती पत्राद्वारे केली होती. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.त्यासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. श्रेयस ठाकूर यांच्या मागणीला यश आले असून कोरोना रुग्णांना याचा लाभ होणार असल्याने श्रेयस ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.