न्यूज अपडेट: नवी मुंबई पालिका क्षेत्रातील महागड्या वेग वेगळ्या कलाशिल्प केल्यामुळे जागरुक नागरिक नाखुश पण कलाप्रिय आनंदी:
न्यूज अपडेट: नवी मुंबई पालिका क्षेत्रातील महागड्या वेग वेगळ्या कलाशिल्प केल्यामुळे जागरुक नागरिक नाखुश पण कलाप्रिय आनंदी:
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नुकत्याच झालेल्या कालावधीत नवी मुंबई पालिके कडून विविध ठिकाणी कला शिल्प स्थापन करण्यात आले. नवी मुंबई पालिके कडून नवी मुंबई पालिका क्षेत्रातील ऐरोली ते बेलापूर या पट्ट्या मधेय अनेक ठिकाणाचे जास्त रहदारी असलेले चौक सिग्नल आणि पदपथ यावर टाकाऊ वस्तूपासून तयार केलेले अनेक कला शिल्प लावण्यात आले. त्यापैकी पाम बीच मोराज सर्कल येथे लावण्यात आलेले घोड्याचे कला शिल्प व त्याचा फोटो सोशल मीडिया वर अनेक ठिकाणी झळकला. त्याच प्रमाणे वाशी नेरुळ बेलापूर या ठिकाण वरील कलाशिल्प हि चर्चेत आहेत.
या कला शिल्पा च्या स्थापने बद्दल नवी मुंबईतील नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहावयास मिळाल्या. त्यापैकी कला क्षेत्रात विशेष रुची असणारे नागरिक यांनी टाकाऊ वस्तू पासून recycle करून तयार केलेले हे कलाशिल्प यास पसंती दर्शविली आणि या नाविन्यपूर्ण प्रकाराचे स्वागत केले. वाशी मधील कला प्रेमी आणि फिल्म दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनी नवी मुंबई पालीकेचे या उप्रक्रमाबद्दल आभार मानले. जुई नगर मधील तरुण समाजसेवक उद्योजक बंटी उर्फ संदेश जाधव यांनी पालिकेचे आभार मानून या कलाशिल्पाचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. कला प्रेमी प्रगती आडबोळ यांनी या recycle करून तयार केलेल्या कलाशिल्पाची प्रशंसा केली.
तसेच नवी मुंबईतील काही जागरूक नागरिक आणि सामाजिक भान जपणारे अभ्यासू समाजसेवक यांनी विविध ठिकाणी लावलेले हे कलाशिल्प व त्यावर झालेला खर्च याची आकडेवारी पाहून नाराजी व्यक्त केली. त्याच प्रमाणे या विषया बद्दल अनेक ठिकाणी जागरूक नागरिकांकडून चर्चा झाली. ऐरोली घणसोली मधील लोकप्रिय समाजसेवक सतीश केदारे यांनी सांगितले पालिकेला विवीध कर रूपातून येणारा महसूल हा नवी मुंबईच्या जनतेच्या कष्टाने कमावलेला पैशातून उपलब्ध होतो. हा पैसा नवी मुंबई पालिका प्रशासना कडून योग्य सामाजिक उपक्रमा साठी वापरला जावा त्याचा योग्य उपयोग व्हावा अशी मनीषा व्यक्त केली आणि कलाशिल्प स्थापने वर झालेला खर्च याबाबत खंत व्यक्त केली.
सामाजिक भान जपणारे सिवुड्स येथील उदयोजक मयूर डांगे यांनी या घडलेल्या प्रकार बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.आणि पालिकेशी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. नेरुळ मधील शिक्षण तज्ज्ञ आणि समाज सेवक अश्विन कुमार धस्के यांनी सतत चांगले उपक्रम राबवणारी नवी मुंबई पालिका प्रशासना कडून अशी बाब कशी काय घडू शकते यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला. एकंदरीत पाहता या कलाशिल्प स्थापने बद्दल नवी मुंबईतील नागरिकांच्या वरील प्रमाणे संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.