न्यूज अपडेट: सोशल माध्यमावर चुकीच्या उपचाराने वेळ वाया जात असल्याचा डॉक्टरांचा दावा:
● सोशल माध्यमावर उपलब्ध असलेले कोरोनावरील वैद्यकीय उपचार न करण्याचे वैद्यकीय क्षेत्रातून आवाहन:
नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- आज सहज उप्लब्ध असलेली एकच गोष्ट म्हणजे आपल्या मोबाईलवर २४ तास उपलब्ध असलेली सोशल मीडिया. व्हाट्स ऍप, फेसबुक, ट्विटर इंस्टाग्राम व इतर अनेक ऍप्स आपल्याला जगामध्ये काय चाललंय याची दर मिनिटाला बातमी देत असतात याबरोबरच फॅशन, खानपान, सहलीची ठिकाणे तसेच मुंबई व इतर शहरात घडणाऱ्या घडामोडी याबाबत सुद्धा अगदी खोलामध्ये जाऊन बातम्या देत असतात. लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावरील वावर तब्बल १२० टक्क्यांनी वाढला आहे.
लॉकडानच्या आधी एक व्यक्ती दिवसाला १५० मिनिटं सोशल मीडियावर घालवत होती. तोच वेळ आता २९० मिनिटं इतका झालाय. म्हणजे लोक दिवसाला जवळपास साडेचार ते पाच तास सोशल मीडियावर वावरू लागलेत. आता सोशल मीडिया हा फक्त करमणुकीचा भाग राहिला नसून यामध्ये दाखविल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आपण आत्मसात करू लागलो आहोत परंतु कोरोनाच्या या महामारीत सोशल माध्यमांमध्ये सुचविलेले अथवा एखाद्या डॉक्टरने सांगितलेले कोरोना वरील उपचार न करण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले," आजमितीला लॉकडाउन असल्यामुळे आपण अतोनात सोशल मीडियाचा वापर करीत आहोत परंतु सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. सोशल मीडियामध्ये येणाऱ्या अनेक पोस्टवर काही वाचक हे डोळे बंद करून विश्वास ठेवतात व अनेकवेळा त्याना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे व ही लाट गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक प्रबळ आहे त्यामुळे कोरोनावर उपचार करताना सोशल मीडियाचा सल्ला घेणे हे सध्याच्या परिस्थतीत महाग पडेल कारण अनेक नागरिक पाहिले सात ते आठ दिवस घरगुती उपचार करतात त्यामुळे त्यांची स्थिती गंभीर होते. साधा ताप अथवा सर्दी झाली असले तरी कोरोनाची चाचणी करून घेणे फायदेशीर आहे. अनेक नागरिक सोशल मीडियाचा आधार घेऊन गरम पाण्याची वाफ घेणे, काढे बनविणे तसेच अंगाला मालीश करणे असे उपचार करत राहतात , त्यामुळे कोरोना वरच्या उपचारांना विलंब होतो.
कोरोनाची ही लाट आपण गंभीरपणे घेतली पाहिजे व थोडा जरी संशय आला तर कोरोनाची चाचणी करून घेणे गरजेचे असून यात समाजहित आहे."करोना संकटामुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे. महाराष्ट्रात सध्या रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड तसेच अनेक औषधांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते आहे. अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आपल्या इंस्टाग्राम तसेच सोशल मीडियावरील स्टोरीच्या माध्यमातून वैद्यकीय साधनांची उपलब्धता व अडचणीत असणाऱ्या लोकांची माहिती देण्याचे काम सोशल मिडीया करीत असली तरी कोरोनाग्रस्तानी सोशल मीडियाचा वापर कमी करावा कारण अनेकवेळा अशा बातम्यांमार्फत मानसिक ताण तणाव वाढण्याची शक्यता असते.
सोशल मीडियातून अनेकवेळा आपल्या जवळची अथवा संपर्कांतील व्यक्ती गेल्याचे कळते परंतु याचा आघात अनेकजण झेलू शकत नाहीत म्हणूनच कोरोनाग्रस्तांनी संपूर्ण बरे झाल्याबर सोशल मीडियाचा वापर करावा अशी माहिती कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व फिजीशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार यांनी दिली.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.