Skip to main content

न्यूज अपडेट: लढा भूमीपुत्रांचा, ध्यास दि.बा.पाटील नावाचा..!!

न्यूज अपडेट: लढा भूमीपुत्रांचा, ध्यास दि.बा.पाटील नावाचा..!!

नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- महाराष्ट्र असलेली ७२० किमी लांब एवढी कोकणकिनारपट्टी ही फार विशाल आहे. ह्याच कोकणकिनारपट्टीत असलेली पालघर, ठाणे, रायगड हे विभाग सर्वांना ज्ञात असतीलच. या विभागात असलेले आगरी , कोळी, कराडी, कुणबी, तटकरी, आदिवासी समाज म्हणजे परंपरेचा वारसा जपणारे स्रोतच आहेत. भारत देशातच नव्हे तर  सबंध जगभरात अश्या व्यक्ती होऊन गेल्यात ज्यांच्यामुळे त्या समाजाला न्याय व हक्क मिळालेत. अर्थातच ती व्यक्ती समाजाची आधारस्तंभ बनते. त्याच प्रमाणे आगरी कोळी कराडी समाजातील स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देऊन समाजाचा उद्धार करणारे माजी खासदार स्व. दि.बा.पाटील हे या समाजाचे दैवत मानले जातात. आपल्या समाजासाठी असलेले प्रेम व जिव्हाळा दि.बा. पाटील यांच्या कार्यातून दिसून आले आहे.  

देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी दिन-रात कष्ट करून देशाची काळजी घेतो. पण त्याची काळजी कोणीही घेतली नाही. पण दि.बा.पाटील यांनी स्थानिक शेतकऱ्यांसाठी व त्यांचे अस्तित्व टिकुन रहावे यासाठी अनेक लढे दिले. वर्षोनुवर्षे त्यांनी रायगड व ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांना , शेतकऱ्यांना एकत्र घेऊन संघर्ष केला. साल १९७० ते १९८४ इतकी वर्षे सातत्याने संघर्ष केल्या नंतर अखेर १२.५ टक्क्यांच्या कायदा मंजूर झाला व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात १२.५ टक्के एवढा विकसित भूखंड देण्याचा कायदा पुढे आला. या मागे आपल्या समाजाचा विकास व भरभराटी हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून दि.बा. पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा यशस्वी करून दाखवला. समृद्ध नवी मुंबई घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचे नाव न देता विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पालघर , ठाणे , रायगड , मुंबई , विभागातील स्थानिक भूमिपुत्र करत आहेत. त्यामुळे आता नामकरणाबाबत वाद चालले आहेत. प्रत्येक समाजासाठी असंख्य आदर्श व्यक्तींनी कामगिरी केली आहे म्हणून त्या समाजाने त्या आदर्श व्यक्तींवर असलेल्या प्रेम व निष्ठतेसाठी योग्य कार्य करून प्रेरणास्तंभांचे नाव मोठे केले आहे. त्याच प्रमाणे  आगरी कोळी कराडी समाजातील स्थानिक भूमीपुत्रांचे प्रेरणास्थान असलेले दि.बा.पाटील यांच्या कार्याप्रति व समाजाच्या अस्तित्वासाठी सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी आता लढा पुकारला आहे. सर्व भूमीपुत्रांनी एकत्र येऊन संघर्षाला सुरुवात केली आहे , तरुणाईने सुद्धा ह्यात आता आपला सहभाग नोंदवला आहे.नवी मुंबई विमानतळाबाबतच्या लढयात समाजाच्या अस्तित्वासाठी सर्वजण एकत्र आले आहेत व हा लढा नक्कीच यशस्वी होईल असा आत्मविश्वास भूमिपुत्रांना दाखविला आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे