न्यूज अपडेट: काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने; जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी नोंदवला निषेध..।।
न्यूज अपडेट: काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने; जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी नोंदवला निषेध..।।
● भारतीय जनता पक्षाने (भाजपा) केंद्रात सात वर्षे सत्ता स्थापन केल्यामुळे, इंधन दरवाढीबाबत आणि कोविड -१९ च्या व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला
नवी मुंबई (रूपाली वाघमारे) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. सात वर्षाच्या काळात मोदी सरकारने जनतेची निव्वळ दिशाभूल केलेली आहे. याचाच निषेध म्हणून नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात ठिकाणी आंदोलने करण्यात आली. वाशी येथील काँग्रेस भवन बाहेर कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत मोदी सरकारचा निषेध केला. सात वर्षात ना केला विकास मोदींनी केला देश भकास असं म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
एका अधिकृत निवेदनानुसार, नेते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या सात वर्षांच्या कारकिर्दीत देशाची सतत घसरण होत आहे आणि त्याचे गंभीर परिणाम लोक आज भोगत आहेत.
दरम्यान, शनिवारी पेट्रोलच्या किंमतीत शतक झळकणारी मुंबई ही पहिली मेट्रो ठरली. दरम्यान, शनिवारी नवी मुंबई शहरात कोरोनाचे १०१ नवीन रुग्ण आणि ६ मृत्यूची नोंद झाली. लवकरच मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या काही जिल्ह्यांत लॉकडाउनवरील निर्बंध शिथिल होण्याची अपेक्षा देखिल आहे. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या वेळही वाढविण्यात येतील. शासनाने काही टक्के कर्मचार्यांना कार्यालयात परत काम करण्याची परवानगी देण्याचीही अपेक्षा आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.