न्यूज अपडेट: विमल आणि मुरजी याद रख, तुझी माझ्याशी गाठ आहे. :- पँथर डॉ. राजन माकणीकर:
नवी मुंबई (प्रतिनिधी/नीलेश भोईर) :- गरीब लोकांची घरे विकून खाऊ नकोस त्यांना त्यांचा हक्क दे, नाहीतर गुजरात पळायला कमी पडेल, विमल आणि मुरजी याद राख गाठ स्वाभिमानी जयभीम वाल्याशी आहे असा इशारा पँथर डॉ राजन माकणीकर यांनी दिला. उष्टी बिडी मागून बनावट कार्टरेंज बनवून विकणार्या चिटर माणसा याद राख तुझी गाठ स्वाभिमानी जयभीमवाल्याशी आहे, शासनाच्या प्रकल्पात चोरी करून धंनदांडगा झाला म्हणजे कुणालाही विकत घेशील अस नाही.
एमआयडीसी तील पुनर्वसन योजना, साईवाडी, हरी नगर, शिवाजी नगर, शंकरवाडी महापालिका पुनर्वसन प्रकल्पातील केलेल्या दोघांच्या चोरीचा बहीखाता माझ्याकडे असून आता तुला लागलेले आमदारकीची डोहाळे जेलमध्ये पूर्ण करण्याची वेळ मी तुझ्यावर आणतो आहे. आजही विकासक आणि तू पाण्याच्या मूलभूत प्रश्न सोडवला नसून टँकरचे पाणी पिऊन नागरिक आजारी पडत आहेत,आजही कित्येकांना भाडे धनादेश प्राप्त नाहीत, कित्येकांना सदनिकेचा ताबा नाही, कित्येकांची घरे बळकावली आहेस. अनेकांना फक्त तू कारारनामे करून कोपराला गूळ लावला आहेस याचा कालाचीठा सर्व माझ्याकडे आहे.
लोकांवर केलेला अन्याय अत्याचार व मूलभूत गरजा नाही पुरवल्यास समस्त त्रस्त नागरिक आकृती हब टाऊन विकासक शाह अन महादलाल मुरजी पटेल तुझ्या घरावर मोर्चा आणू याची नोंद घेण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.