Skip to main content

न्यूज अपडेट: नवी मुंबई शहरातील ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानामधून येणाऱ्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास:

न्यूज अपडेट: नवी मुंबई शहरातील ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानामधून येणाऱ्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास:

नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- नवी मुंबई शहरातील पाम बीच मार्गालगत मोक्याचा ठिकाणी वसवलेल्या नेरुळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई उद्यानातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वरवर आकर्षित दिसणाऱ्या या उद्यानात सर्वाधिक प्लास्टिक कचरा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या उद्यानात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

सर्वाधिक उद्याने असणाऱ्या शहरांमध्ये नवी मुंबई शहराचे नाव कायम अग्रस्थानी असते. १२० हून अधिक उद्यानांचा समावेश असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेने नेरुळ येथे ज्वेल ऑफ नवी हे सर्व सोयीसुविधांनी समृद्ध असे भव्य उद्यान काही वर्षांपूर्वी विकसित केले आहे. तलावाच्या सभोवताली सुमारे अडीच किलोमीटर अंतर असणारा जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, प्रसाधनगृह, पार्किंग, आधुनिक विद्युत व्यवस्था अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भव्य जॉगिंग ट्रॅकमुळे तरुणाईबरोबर, वृद्धांचे व्यायाम करण्यासाठी येण्याचे प्रमाणदेखील मोठे आहे.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून या उद्यानातील समस्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तलावात सोडण्यात आलेल्या मलवाहिन्यांच्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने सद्यस्थितीत उद्याने पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून उद्यानातील प्लास्टिक कचरा तसेच दुर्गंधी याबाबत नागरिकांकडून महापालिकेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र महापालिका प्रशासनाने याची दखल न घेतल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे