Skip to main content

न्यूज अपडेट: नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी; आत्मदहन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही:

न्यूज अपडेट: नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी; आत्मदहन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही:

● मुख्यमंत्र्यांनी लोकभावना समजूनच घेतल्या नाहीत दिबासाहेबांच्या नावासाठी संघर्षाचा लढा कायम राहणार २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी ; वेळ पडल्यास आत्मदहन आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर असेल तर आम्ही रिॲक्शन मोडवर असणार 

पनवेल (प्रतिनिधी/किरण पवार) :- रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हहामुळे दुसऱ्या फेरीची चर्चाही फिसकटली आहे . त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली हि भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त गावांवर अन्यायकारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या हेकेगिरी भूमिकेला आमचा प्रखर विरोध असून प्रकल्पग्रस्ताचे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी घोषित दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने दिनांक २१ जून रोजी आयोजित करण्यात आलेले पत्रकार परिषेदेत येत्या २४ जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच अशी रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर असेल तर आम्ही रिअ‍ॅक्शन्स मोडवर असणार आहोत, असा खणखणीत आवाजही कृती समितीने दिला आहे. 

यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगण्यात आलेली कि, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासंदर्भात रविवारी दिनांक २० जून रोजी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ' वर्षा ' निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या हहामुळे फिसकटली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून उठून निघून गेले. त्यामुळे काहीही झाले तरी ' दिबांच्या नावासाठी आमी माघार घेणार नाही , असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केला आहे. या बैठकीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाय शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोच एमडी संजय मुखर्जी, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, तसेच संतोष केणे, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, भूषण पाटील, दशरय भगत, मनोहर पाटील, विनोद म्हात्रे, मेघनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते. या वेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाधे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने २४ जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार ठाम केला आहे . भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकऱ्यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे . 

तर, सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. खरतर ही मागणी सन २००८ पासूनची आहे. असे असताना राज्यातील ठाकरे सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले असून तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमार्फत करुन घेतला आहे. त्यात रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिन्यांतील ' दिबा प्रेमी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हा असंतोष १० जून रोजी मानवी साखळी आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आला होता. तरीही शिवसेनेचे नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. 

दरम्यान २४ जूनच्या आंदोलनाच्या धसक्यामुळे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे त्याचबरोबर नोटिसा बजावण्याचे तर दुसरीकडे दिबासाहेबांच्या नावाला विरोध करणारे विविध क्लुप्त्या करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे सांगून दिबासाहेबांच्या नावासाठी कितीही विरोध झाला तरी हे आंदोलन होणारच, असेही लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने यावेळी स्पष्ट केले. 

पत्रकारांना अधिक माहिती देताना कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की, नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी बोलाविलेल्या या बैठकीत आमी सर्वपक्षीय कृती समितीने विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला, मात्र चर्चा सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळासाठी दुसरे कुठले नाव सुचवायचे असेल तर सुचवा असे म्हटले, पण आम्ही आताही ' दिबांच्या नावावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुम्ही असा आग्रह धरत असाल तर आमचे शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, असे सांगितले. एकीकडे त्यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ममता बॅनर्जी व त्यांच्या कार्यकत्यांनी पश्चिम बंगालमध्ये अस्मिता जपण्याचे उचललेले पाऊल अभिनंदनीय असल्याचे म्हटले आणि दुसरीकडे मात्र ते पनवेल, उरण, रायगडसह कोकणची जनता जी अस्मिता जपतेय तिला नाकारतात. ' दिबा साहेबांच्या नावासाठी २७ सूचना गेलेल्या असताना तुम्ही नाव सुचविले नाही, सरकारने नाव सुचविले नाही, असे सांगता. वास्तविक सिडकोकडे प्रकल्पग्रस्तांच्या व त्यांच्या संघटनांच्या अनेक सूचना गेलेल्या आहेत. सिडको संचालक मंडळात ठराव झाला नाही हा पुढचा भाग आहे. विमानतळाचे काम पूर्ण होईल तेव्हा करता येईल , पण म्हणून एवढ्या लवकर नामकरण उरकून घेणे योग्य नाही.

दरम्यान, २४ जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जोरदार तयारी पूर्णत्वास आली असून, त्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या विभागनिहाय बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. 'आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दिबांचंच नावा, 'अशी ठाम भूमिका' दिबा प्रेमी जनतेने घेतली आहे. किमान एक लाख लोक दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानळाला देण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्र एकवटले आहेत. 'दिबांची अस्मिता जपण्यासाठी भेद बाजूला करून सज्ज होऊ या, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. तसेच ते पुढे म्हणाले की, प्रशांत ठाकूर, महेश दालदी व गणपत गायकवाड या तिन्ही आमदारांनी पोलीस आयुक्तांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम्हाला अडवायचा प्रयत्न केल्यास आम्ही आत्मदहनाची वेळ आली तरी मागे हटणार नाही. आम्ही आंदोलनस्थळी जाणारच आणि तुम्ही जाऊ दिले नाही, तर रस्त्यात जे काही होईल त्यास शासन व पोलीस जबाबदार असतील, असेही ठणकावले आहे. 

शिवसेनेची दुटप्पी भूमिका लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासंदर्भात विषय निघाला तर शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि जिल्हाध्यक्ष शिरीष घरत म्हणतात की, तुम्ही केंद्रात जाऊन केंद्र सरकारकडून दि.बा. पाटील यांचे नाव मंजूर करून आणा. आमचा त्याला पाठिंबा असेल, मात्र हीच मंडळी सिडकोने केलेल्या ठरावाला पाठिंबा देतात आणि राज्य सरकारकडे सिडकोच्या ठरावाचा आग्रह धरतात. म्हणजे एका बाजूला सांगायचे तुम्ही दिल्लीला जाऊन नाव मंजूर करा आणि दुसऱ्या बाजूला यांनी सिडकोकडून ठराव कस्न आमच्या पायात पाय घालायचा. हे असे उद्योग का करता ? आम्ही तर दि. बा. पाटील यांचे नाव मंजूर करून घेऊच, कारण आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असेही सर्वपक्षीय कृती समितीने' दिबा विरोधी मंडळींना सुनावले आहे.

मुख्यमंत्र्यांनी लोकभावना समजून घेणे क्रमप्राप्त - दशरथदादा पाटील

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले. यावरून त्यांचा संताप झाला आणि ते बैठकीतून निघून गेले. ही बाब बरोबर नाही. त्यांनी लोकभावना समजून घेतल्या पाहिजेत. सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करावा. दशरथदादा पाटील, अध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती 

मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेले हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण -जगन्नाथ पाटील 

मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेले हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे. १९६० साली राज्याची स्थापना झाली . त्या वेळी मुख्यमंत्री झालेले यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कुणीही राज्यातील एखाद्या प्रकल्पाला आपल्या आई - वडिलांचे नाव द्यावे, असे सांगितलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही आपल्या पिताश्रींच्या नावाचा आग्रह धरू नये.

मुख्यमंत्री धमकी देतात हा लोकनेते दि. बा. पाटील व त्यांच्या कार्याचा अपमान --आमदार प्रशांत ठाकूर

२४ जूनचे आंदोलन करायचे हा आपला निर्धार पक्का आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र तुम्ही आंदोलन करीत असाल, तर शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, अशी भाषा केली. अशा प्रकारे मुख्यमंत्री धमकी देतात हा लोकनेते दि. बा. पाटील व त्यांच्या कार्याचा अपमान आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता याविरोधात रस्त्यावर उतरेल. पोलिसांच्या आडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होईल, पण आपण ठाम राहायला हवे. 

घेराव आंदोलनातून महाराष्ट्र सरकारची झोप उडविण्यासाठी सज्ज राहा.- आमदार महेश बालदी

सर्वपक्षीय कृती समितीत जे ठरेल ते निर्देश आपल्याला पाळायचे आहेत. पोलिसांनी आंदोलनाला जाऊ नका , गुन्हे दाखल होतील, असे म्हटले आहे, पण श्रद्धेय दि.बा. पाटील यांच्यामुळे आपल्याला चांगले दिवस दिसले . मणूनच घेराव आंदोलनातून महाराष्ट्र सरकारची झोप उडविण्यासाठी सज्ज राहा. 

दिबा विरोधकांना आणि सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे - आमदार गणपत गायकवाड 

मुख्यमंत्र्यांनी लोकभावना लक्षात घेतल्या पाहिजेत , मात्र ते बैठकीतूनच उठून गेले. आता भूमिपुत्रांनी आपली अस्मिता जपण्यासाठी एकत्र आले पाहिजे. सरकार आपले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करेल, पण आपण ठाम राहिले पाहिजे. नाहीतर पुढील पिढीला अपमानित जीवन जगावे लागेल, न्याय्य हक्कांसाठी झगडावे लागेल. हीच ती वेळ आहे की आपण ' दिबा विरोधकांना आणि सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करणार - महिला मंडळांचा पुढाकार 

भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी २४ जूनला सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. ज्येष्ठ आणि तरुणाची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत असताना महिलाही मागे राहिल्या नाहीत. २४ जूनला योगायोगाने याच दिवशी वटपौर्णिमा आहे. असे असले तरी भूमिपुत्र सावित्रींनी यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनात साजरी करण्याचा निर्धार केला आहे आणि या लढाईच्या अनुषंगाने आपल्या सौभाग्याला अधिक बळ देण्यासाठी सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करणार असून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचा नाव मिळेपर्यंत या संघर्षात महिलांचाही सहभाग राहणार आहे. आणि तशी तयारी देखील महिला मंडळाकडून जोरदार सुरु आहे.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे