न्यूज अपडेट: हसत हसत जगता यायला हवे: प्रा. जगदीश संसारे ।।
मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- शिवकार्यच लय भारी या समुहाने 'संवाद शिवकार्यचा' या उपक्रमांतर्गत विविध वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. सदर व्याख्यानमालेत शुक्रवार दिनांक २५ जून २०२१ रोजी झूम मिटिंगद्वारे ६८ वे पुष्प गुंफताना प्रा. जगदीश संसारे म्हणाले,"समस्यांचा डोंगर प्रत्येकाला चढून जावाच लागतो. आपले दुःख उगाळत बसायला ते काही चंदन नाही. आपल्या प्रत्येकाला हसत हसत जगता यायला हवे." ते पुढे म्हणाले,"आपल्या चेहर्यावर नेहमीच हास्य असावे त्यामुळे आपले मन प्रसन्न रहातेच पण समोरचा देखील आपल्याला पाहून क्षणभरासाठी त्याचे दुःख विसरतो." आपल्या मिश्किल संवांदांनी आणि विनोदी कविता सादर करून संसारे यांनी महाराष्ट्रातील १०० हून अधिक रसिकांना मंत्रमुग्ध केले.
शिवकार्यच लई भारी समूहाचे संस्थापक दीपक गांगुर्डे, शिवचरित्रकार रोशन गांगुर्डे, कैलास नाथ पाटील, अनिल घव्हाणे, समाधान गांगुर्डे, नंदू पवार, अतुल कासव हे मान्यवर देखील कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. सुखदेव आहेर यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक केले तर, भाऊसाहेब दाभाडे यांनी आभार मानले.
सुभाष नाईक, प्रा. डॉ संजय पाटोळे, अमरदीप मखामले, उज्वला चुरी, प्रितम फिसरेकर, अनुराधा आटोळे या मान्यवर रसिक श्रोत्यांबरोबर संसारे सरांचे काही विद्यार्थी श्रावणी खोत, वेदश्री डोंगरे, तेजस्वी कांबळे, वर्षा खंकाळ, पुर्वा चुरी हे सुद्धा उपस्थित होते.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.