न्यूज अपडेट: नेरूळ सारसोळे गावातील पालिकेच्या चालू असलेल्या कमानीच्या खाजगी कामावर आक्षेप - मनोज मेहेर:
न्यूज अपडेट: नेरूळ सारसोळे गावातील पालिकेच्या चालू असलेल्या कमानीच्या खाजगी कामावर आक्षेप - मनोज मेहेर:
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नेरूळ सेक्टर ६ मधील दर्शन दरबार मार्गावर विक्रम बारजवळ शनिवारपासून गावाच्या प्रवेशमार्गावर कमानीचे काम सुरू झाले आहे. वास्तविक पाहता नवी मुंबईत गावांचे अस्तित्व ठळकपणे दिसावे, गावांची स्वतंत्र ओळख असावी यासाठी महापालिका खर्चाने गावांच्या प्रवेशद्वारावर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. काही गावांच्या मार्गावर प्रवेशद्वार उभारण्याची प्रकिया सुरू आहे. तथापि या ठिकाणी बांधण्यात येणारे प्रवेशद्वार हे स्वखर्चाने विशिष्ठ एका धर्मियांकडून त्यांच्या प्रार्थनास्थळाच्या नावाने बांधण्यात येत आहे. या प्रकरणी घटनास्थळी व पालिकेत चौकशी केली असता, या घटकांना महापालिका आयुक्तांनीच परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. ही परवानगी म्हणजे नवी मुंबईत चुकीचा पायंडा पडण्याची सुरुवात असून कमानीची परवानगी रद्द करून काम बंद करण्याची मागणी सारसोळे गावचे ग्रामस्थ व महापालिका 'ब' प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज मेहेर यांनी मुख्यमंत्री, नवी मुंबई महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून के ली आहे.
गावाची ओळख पुसण्याचा प्रयत्न आधीच विमानतळ प्रकरणामुळे ग्रामस्थांच्या भावनिक अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच महापालिका प्रशासनाने स्वखर्चाने प्रार्थनास्थळांच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या कमानींना (प्रवेशद्वार) परवानगी देऊन गावाची ओळख पुसण्याचा, अस्तित्व मिटविण्याचा प्रयत्न करून ग्रामस्थांच्या भावनेचा अपमान करू नये. मतांच्या राजकारणासाठी हे नाव दिले जात असल्याची देखील चर्चा नेरुळमध्ये रंगली आहे .
महापालिकेकडून प्रक्रियेला हरताळ शिवसेनेच्या माजी नगरसेविका सरोज पाटील यांनी सभागृहात त्यांच्या सीबीडी बेलापूर विभागातील अगरोळी गावाला, गावातील प्रसिद्ध असलेल्या गणपती उत्सवावरून' अगरोळी गाव' 'एक गाव एक गणपती' असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यावेळी भाजपाचे तत्कालीन महापौर जयवंत सुतार यांनी सभागृहात गावाच्या नावा व्यतिरिक्त कमानीवर कोणतेही नाव दिले जाणार नाही, असे संगितले होते. माजी महापौर सुतार यांच्या या निर्णयाने सेनेचे माजी नगरसेवक नगरसेवक नामदेव भगत यांनी विरोध गेला होता. हा वाद इतका विकोपाला जाऊन एकमेकांप्रति अपशब्द उद्गारले गेले. मात्र माजी महापौर हे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने नवी मुंबईतील गावाच्या प्रवेशद्वारांना फक्त गावांचीच नावे देण्यास सुरुवात झाली. पालिकेकडून या प्रक्रियेला हरताळ फासत विशिष्ट धर्मियांना प्रवेशद्वार उभारून नाव देण्याची परवानगी आयुक्तांनी दिल्याने यापुढे नागरसेवकांकडून आपापल्या नातेवाईकांची नावे देण्याचे प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे .
परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे महापालिका आयुक्तांच्या एका चुकीचा फटका नवी मुंबईला सहन करावा लागू शकतो. या चुकीच्या निर्णयामुळे नवी मुंबईतील गावांच्या अस्तित्वाचा, त्यागाचा व ओळखींचा विसर पडण्यास सुरुवात होईल, त्यासाठी आयुक्तांनी दिलेली परवानगी रद्द करून संबंधित कामास नकार देण्यात यावा अन्यथा प्रत्येक रस्त्यारस्त्यावर कमानी (प्रवेशद्वार) उभ्या राहतील व गावांच्या कमानी पुन्हा लोकांना नव्याने गुगलमॅपवर शोधाव्या लागतील. आयुक्तांनी दूरदृष्टी ठेवत विषयाचे गांभीर्य समजून घ्यावे. या कमानीला देण्यात आलेली परवानगी स्थगित करून काम रद्द करण्याच्या पालिका प्रशासनाला सूचना करण्याची मागणी मनोज मेहेर यांनी निवेदनातून केली आहे.
गावाची ओळख पुसण्याचा प्रयत्न आधीच विमानतळ प्रकरणामुळे ग्रामस्थांच्या भावनिक अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच महापालिका प्रशासनाने स्वखर्चाने प्रार्थनास्थळांच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या कमानींना (प्रवेशद्वार) परवानगी देऊन गावाची ओळख पुसण्याचा, अस्तित्व मिटविण्याचा प्रयत्न करून ग्रामस्थांच्या भावनेचा अपमान करू नये. मतांच्या राजकारणासाठी हे नाव दिले जात असल्याची देखील चर्चा नेरुळमध्ये रंगली आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.