ब्रेकिंग न्यूज:- राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन:
ब्रेकिंग न्यूज:- राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन:
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव (आबा) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्यसंपन्न पर्वाचा अंत झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी ५५ वर्षे प्रतिनिधीत्व केले. सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. कृषी, सहकार, क्रीडा क्षेत्रासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृह शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाहीत महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात 1962 ते 2014 या कालावधीत 13 वेळा निवडणूक लढवली व 11 वेळा ते निवडणुकीत निवडून आले 1962 व 1967 च्या निवडणुकीत ते विजयी झाले. परंतु, 1972 च्या निवडणुकीत मात्र ते काँग्रेसचे काकासाहेब साळुंखे यांच्याकडून 1955 मतांनी पराभूत झाले.
त्यानंतर काकासाहेब साळुंखे यांच्या निधनानंतर 1974 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले 1978 , 1980 1985 ,1990 च्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात केली 1995 च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांच्याकडून 195 मतांनी पराभूत झाले 1999, 2004, 2009 व 2014 च्या निवडणुकीत त्यांनी विजयश्री प्राप्त केली होती.
शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांचे पार्थिव सोलापूरहून सांगोल्याला आणण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दोन तास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघून सांगोला सूत मिलमधील मैदानात जाईल. अखेर त्यांच्यावर सूत मिलमधील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती वृत्तास देण्यात आली आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.