न्यूज अपडेट: गरजूंच्या मदतीसाठी शिवकन्या प्रतिष्ठानची साथ; चला तर होऊया सारे सहभागी:
नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- 'जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा' हे स्वामी विवेकानंद यांचे ब्रीद अनेकांना माहीत आहे परंतु यावर हवी तशी कृती कोणीही करत नाही. परंतु पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील युवकांच्या संकल्पनेतुन तयार असलेले "शिवकन्या प्रतिष्ठान" जनसेवा करून आनंद पसरवत आहेत. गरजू लोकांना मदत करून त्यांच्यामध्ये सकारात्मकता पसरवण्याचे काम ह्या प्रतिष्ठानाच्या संस्थापिका जिज्ञासा चौधरी करत आहेत. शिवकन्या प्रतिष्ठान वाडा, पालघर, भिवंडी, नाशिक परिसरातील कुटुंब, महिला, विद्यार्थी आणि गरजूंची मदत करत आहेत.
देशातील काही भागांत अजूनही काही ठिकाणी लोकांच्या अंगावर घालायला कपडे नाहीत, औषधे नाहीत ही बाब गांभीर्याने लक्षात घेत, अश्या भागांत जाऊन ही सगळी टीम काम करत असते. गरजूंना मदत करण्यासाठी ह्या उपक्रमात ऑनलाईन माध्यमातून देखील आपण आपला सहभाग दाखवू शकतो असे आव्हान ह्या प्रतिष्ठान तर्फे सर्वांना करण्यात आले आहे. आपापल्या परीने जनजागृती करून सर्वांनी ह्या कार्यात सहभागी झालो तर नक्कीच आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिल्याचे समाधान नक्कीच आपल्याला मिळेल.
"शिवकन्या प्रतिष्ठान च्या ह्या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी जनसेवेत रुजू व्हावे" असा संदेश संस्थापिका जिज्ञासा चौधरी ह्यांनी केले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.