न्यूज अपडेट: २०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा; "सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम":
नवी मुंबई (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) :- मुंबई महानगरीत ज्यांना घर नाही अश्या बेहर जनतेला शासनाच्या वतीने २०२३ पर्यंत हजारोना घर उपलब्ध होणार असल्याची माहिती सम्यक मैत्रेय फौंडेशन च्या वतीने देण्यात आली आहे. शासनाकडून जमीन हस्तांतरण करून त्यातील निम्म्या जमिनी वर खाजगी विकासाकाकडून गोरगरिबांना इमारतीमध्ये सदनिका उपलब्ध करून देण्याचा मानस संस्थेच्या वतीने बाळगण्यात आला आहे.
दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, मुलुंड, भांडुप व अन्य ज्या ठिकानी सरकारी जमीन जी नापीक असून भग्नावस्थेत पडली आहे, अश्या जमिनीची ९९ वर्षासाठी मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या मदतीने संस्थेच्या वतीने बेघर नागरिकांचे स्वतः च्या हक्काच्या गरचे स्वप्न लवकरच साकार होणार असून युद्धपातळीवर शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे.
मात्र: लवकरच जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन स्वप्नपूर्ती च्या दिशेने मार्गक्रम होत आहे, गोर गरिबांसाठी अल्पदरात सदनिका उपलब्ध करून हक्काचा निवारा उपलब्ध करवून देण्यास संस्थेला यश प्राप्त होत असल्याने संस्थेकडून शासनाचे आभार मानले जात आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.