न्यूज अपडेट: लयभारी ईबुक प्रकाशन आणि ऑनलाईन कवी संमेलन:
मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- लयभारी साहित्य समूहा तर्फे आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी हा उपक्रम पंधरा दिवस घेऊन पंढरीची वारी ह्या विषयावर काव्यलेखन मागवले. त्या कालावधीत आलेल्या ७८ कवितांचा ईबुक मध्ये समावेश करण्यात आला. आषाढी एकादशीच्या दिवशी शामला पंडीत, रंजना मांगले, संतोष रायबान यांच्या हस्ते ह्या कवितांचे ईबुक स्वरुपात प्रकाशन करण्यात आले. सोहळ्याचे मुख्य आयोजन प्रमोद सूर्यवंशी यांनी केले. त्याच दिवशी ऑनलाईन कवी संमेलनाचे नियोजन समूह संचालक अनिल केंगार यांनी केले. त्याचे सूत्रसंचालन धनंजय माने यांनी आपल्या बहारदार शैलीत करून कार्यक्रमाला रंगत आणली. वर्षा फटकाळे वराडे, संगीता महाजन, वर्षा शिदोरे, कविता वालावलकर, शामला पंडित (दीक्षित), वसुधा कोडगीरे, वैभवी मराठे, भाग्यश्री बागड, अनिता नागे/पाठे, रंजना मांगले, आम्रपाली धेंडे, सुचित्रा कुंचमवार, कल्पना अंबुळकर, प्रांजली काळबेंडे, शशिकला गुंजाळ, वसुधा नाईक, योगिता जाधव, नूतन पाटील, संगीता चव्हाण, अंजली राजाध्यक्ष, सुनीता बहिरट, संगीता जामगे, विकास पाटील, हरिदास गौतम, मधुकर गायकवाड, रोहिदास होले, गजानन दराडे, वसंत गवळी, रविकांत जाधव, सचिन पाटील, आमीर पटेल, विशाल पाटील, राकेश बुधाजी डाफळे, अविनाश शिंदे, संगीता महिरे साळवे ह्या सर्व सारस्वतांच्या काव्यातून ईबुक प्रकाशन सोहळा आणि ऑनलाईन कवी संमेलन यशस्वीरित्या पार पडले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.