Skip to main content

न्यूज अपडेट: कुणाशीही युती किंवा आघाडी करून किंवा स्वबळावर यापुढे संभाजी ब्रिगेड एकत्रित निवडणूक लढवणार - अॕड. मनोज आखरे:

न्यूज अपडेट: कुणाशीही युती किंवा आघाडी करून किंवा स्वबळावर यापुढे संभाजी ब्रिगेड एकत्रित निवडणूक लढवणार - अॕड. मनोज आखरे:

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- महानगरपालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांशी युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. आम्हाला कुणीही परके नाही. कुणाशीही हातमिळवणी करून येणाऱ्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ताकतीने निवडणुका लढवणार आहे. गेल्या ३० वर्षांचा संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक कामाचा आढावा महाराष्ट्रासमोर आहेच. संभाजी ब्रिगेड राजकीय पार्टी म्हणून नोंदणी झालेली असून राजकीय सत्तेसाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि जर कोणत्याही पक्षा सोबत हातमिळवणी झाली नाही, तरीही संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य निवडणूका स्वबळावर लढवणार आहे. संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य निवडणूकीत 'पडू,पाडू किंवा निवडून येऊ' हाच एक मुखी निर्णय राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.

"संभाजी ब्रिगेड राज्य कार्यकारिणी बैठक..." शनिवार दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थळ - मातृतिर्थ सिंदखेड राजा, जि. बुलढाणा येथे संपन्न झाली. या बैठकीला राज्यातील सर्व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, सर्व महानगराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष या सर्वांची एकत्रित बैठक झालेली आहे.शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी शंभर टक्के राजकारणाची गरज आहे आणि आज आगामी होऊ घातलेल्या निवडणूकांचा योग्य टायमिंग असल्याने संभाजी ब्रिगेड कुणाशीही हाथ मिळवणी करण्यासाठी तयार असून सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये एकमुखी पाठिंबा दिलेला आहे. कार्यकर्ते सत्तेमध्ये सहभागी झाले पाहिजे हीच संभाजी ब्रिगेड ची अपेक्षा आहे. राजसत्ते शिवाय पर्याय नाही हे एकमेव सूत्र लक्षात घेऊन संभाजी ब्रिगेड ने प्रत्येक स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवावी संघटन वाढवावे व सर्वांशी संवाद साधावा याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक पार पडली. यामध्ये युती किंवा आघाडी चा निर्णय घेण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेड राजकीय मतभेद बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य वेळी योग्य तडजोड करून निवडणुका लढवणार आहे. मुंबई, पुणे व इतर महानगरपालिकेमध्ये व सर्व नगरपालीकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून सर्वसमावेशक ताकदीच्या जोरावर निवडणुका लढवण्याचा संकल्प आहे. महानगरपालिका, नगरपालीका व जिल्हा परिषद मध्ये संभाजी ब्रिगेडचा येनकेन प्रकारे प्रवेश झालाच पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड आता आपले खाते उघडणार यात आता शंकाच नाही. म्हणून युती किंवा आघाडीचा निर्णय लवकरच चर्चेतून सुटेल, असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज आखरे यांनी व्यक्त केला.

मात्र तीर्थ सिंदखेड राजा येथील बैठकीस... संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मा. ॲड मनोजदादा आखरे, महासचीव मा.सौरभ खेडेकर, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, कार्याध्यक्ष सूधीरमामा देशमूख, डॅा.गजानन पारधी, ऊपाध्यक्ष डॅा. प्रदीपकूमार तूपेरे, उपाध्यक्ष सूहाजजी राणे, उपाध्यक्ष अण्णासाहेब सांवत, प्रवक्ते डॅा. प्रा. शिवानंद भानूसे, प्रेमकूमार बोकेसर, प्रदेष संघटन सचिव डॅा.संदीप कडलग, प्रदेश संघटक डाॅ. सुदर्शन तारक, प्रदेश संघटक संतोष शिंदे, शशिकांत कन्हेरे, प्रदेश संघटक अतूल गायकवाड, तूषार ऊमाळे, इंजि.विजय पाटील, ऊमाकांत ऊफाडे, क्रेंदीय कार्यकारिणी सदस्य राहूल वाईकर, संकेत पाटील, अभिजीत दळवी इतर मान्यवर यांची उपस्थिती होती. सर्व सन्माननीय विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्ष, शहराध्यक्ष यांची उपस्थिती होती.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे