Skip to main content

T20 विश्वचषक अपडेट : आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात..!!

T20 विश्वचषक अपडेट : आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात..!!

नवी मुंबई (बातमी/दुबई) :- आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात होत आहे. पण वर्ल्डकपमधील सर्वात चुरशीची लढत ही २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या लढतीची उत्सुकता वाढत चालली असून काही चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानात जाऊन हा सामना पाहता येईल. तर अन्य कोट्यवधी चाहते टीव्हीवरून हा सामना पाहतील.

 भारत आणि पाकिस्तान ही लढत हायव्होल्टेज मानली जाते. दोन्ही देशातील चाहते याकडे युद्धाप्रमाणे पाहतात. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धच्या सर्व लढती जिंकल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या पाच लढतीत पाकिस्तानचा पराभव झाला असून टीम इंडिया यावेळी सहाव्या विजयासाठी उत्सुक असेल.

दोन्ही देशातील हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी चक्क 2 दिवसांची सुट्टी काढली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी पत्रकारांना सांगितले की, T-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी मी सुट्टी काढली आहे आणि स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहणार आहे. मॅच पाहण्यासाठी मी दुबईला जाणार आहे. यासाठी मी पंतप्रधान इमरान खान यांच्याकडून दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे. देवाकडे प्रार्थना आहे की पाकिस्तानला यश देओ. या सामन्याकडे खेळ म्हणून पाहावा. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक लढत पाहण्याची माझी इच्छा आहे. मग ती लढत कोलकातामध्ये असो किंवा चेन्नईमध्ये. या सामन्याचा जो निकाल होईल तो मान्य करावा.

भारताच्या साखळी फेरतील पाच पैकी 4 लढती या दुबईत होणार आहेत. तर एक लढत अबुधाबी येथे होईल.

भारताचे वेळापत्रक  -

२४ ऑक्टोबर- पाकिस्तानविरुद्ध, दुबई

३१ ऑक्टोबर- न्यूझीलंडविरुद्ध, दुबई

३ नोव्हेंबर - अफगाणिस्तानविरुद्ध, अबुधाबी

५ नोव्हेंबर- स्कॉटलंडविरुद्ध, दुबई

८ नोव्हेंबर- ग्रुप ए मधील दुसऱ्या संघाविरुद्ध









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि महत्त्वाचे आपली वेळ येताच कोविड वैक्सीन पूर्ण करून घ्या. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे