व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्यात:
राज्यात व्याघ्र संरक्षणासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे. तसेच जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी ई-बैठकीत दिले.